शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, नंतर रस्ते अपघातात वाढले मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:11 AM

लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या वाढलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना या महामारीचे मोठे संकट जळगाव जिल्ह्यात कोसळले ...

लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या वाढलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोना या महामारीचे मोठे संकट जळगाव जिल्ह्यात कोसळले आहे. कोरोनाच्या या महामारीत जळगाव जिल्ह्यात २,५७० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच रस्ते अपघातात देखील याच काळात दीड वर्षात १,०५२ अपघात झाले, त्यात ६७९ जणांचा मृत्यू झाला. १,४७३ जण जखमी झाले आहेत. २०१८ ते मे २०२१ या साडे तीन वर्षात २ हजार ७३९ अपघात झाले आहेत. त्यात १ हजार ५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजार ९५७ जण जखमी झालेले आहेत.

अपघात व त्यात जीव जाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त जळगाव जिल्ह्याचीच आहे. भरधाव वेगाने वाहने चालविणे, मद्य प्राशन यासोबतच खराब रस्ते या अपघातांना कारणीभूत आहे. जिल्ह्यात लोकसंख्या जशी वाढत आहे, तशीच वाहनांचीही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. घर तेथे वाहन अशी स्थिती जिल्ह्यात आहे. मद्य प्राशन व सुसाट वेगाने वाहने चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यात सर्वाधिक तरुणांचाच बळी जात आहे.

शहर व जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्यमार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. या खड्ड्यांमुळेही अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. महामार्गावर तर खड्ढे व साईडपट्ट्या यामुळे अपघात होत आहेत. वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी कितीही जनजागृती केली तरी वाहनचालकांची मानसिकता बदलत नाही. दंड भरायलाही वाहनधारक तयार होतात, परंतु वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. अवैध प्रवाशी वाहतूक करताना प्रवाशी मिळविण्याची स्पर्धाच घातक ठरत असून महागड्या दुचाकी यामुळे वेगाची मर्यादा ओलांडली जात आहे.

लॉकडाऊनमध्येही वाढले अपघात..

लॉकडाऊन काळात अनेक निर्बंध असल्याने अनावश्यक बाहेर फिरणारे असतील किंवा सरकारी बसेसला परवानगी नव्हती. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी असला तरी या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन त्यात अनेकांचा जीव गेला आहे. यंदाच्या मार्च ते मे या तीन महिन्यात ११७ अपघातात १०७ जण ठार झाले तर ५३ जण जखमी झाले. गेल्या वर्षी लॉकडाऊन काळातच सर्वाधिक अपघात झाले असून एप्रिल ते जुलै या चार महिन्यात तब्बल १८८ अपघात झाले आहे. त्यात १४४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७४ जण जखमी झालेले आहेत.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

पायी चालणाऱ्या किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्या अनेकांना भरधाव वाहनाने उडविल्याच्या घटना जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. कोरोना काळातच पायी चालणाऱ्या एका वकिलाला डंपरने उडविले होते. सामनेर,ता.पाचोरा येथेही पायी चालणाऱ्या दोन महिलांना पहाटेच्या सुमारास चारचाकीने उडविल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

या अपघातात ४० वर्षाच्या आतील मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. घरातील तरुण कर्ता पुरुषच या अपघातात ठार झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. देशात दहशतवादी हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांपेक्षा रस्ता अपघातात ठार होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी चिंताजनक आहे. ही बाब लक्षात घेता एका जागेवर तीन पेक्षा जास्त अपघात झाले असतील तर ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

महामार्गाला लागून अनेक ठिकाणी धोकादायक चौक आहेत. अग्रवाल हॉस्पिटल, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, विद्युत कॉलनी, खोटे नगर, अजिंठा चौक हे चौक अत्यंत धोकादायक आहेत. शिव कॉलनी व बांभोरी पुलाजवळील कठडेही धोकादायक आहेत. तसेच महामार्गाला लागून अनेक ठिकाणी साईडपट्ट्या अतिशय उंच आहेत. गतिरोधकही नियमात नाहीत. बांभोरी ते डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या दरम्यान अपघाताची संख्या व त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. शिव कॉलनी व तरसोद फाटा हे शहरात दोन ब्लॅक स्पॉट जाहीर करण्यात आले आहे.

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य !

फोटो...

पहूरजवळ ट्रॅव्हल्स बसने आमच्या चारचाकीला कट मारल्याने आमचे वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात पाय फ्रॅक्चर झाला. दोन वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. या अपघातातून नशिबाने बचावलो आहे.

-भैया पाटील, अपघातातून बचावलेला तरुण

फोटो....

दोन वेळा अपघातातून बचावलो आहे. ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत वाहन पलटी होऊन सहकारी गंभीर जखमी झाला होता. स्वत: वाहन चालवत असल्याने बचावलो होतो. विरुध्द दिशेने बसने धडक दिली होती. वाहनाचा चक्काचूर झाला होता. वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले होते.

-प्रदीप पाटील, अपघातातून बचावलेला वाहन चालक

असे आहेत साडे तीन वर्षातील अपघात

वर्ष : अपघात मृत्यू जखमी

२०१८ ८५२ ४२२ १२६०

२०१९ ८३५ ४५४ १२२४

२०२० ७२१ ४७१ १०३९

२०२१ ३३१ २०८ ४३४

(मे पर्यंत

पहिला लॉकडाऊन १८८ १४४ ७४

दुसरा लॉकडाऊन ११७ १०८ ५३

--