शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

भांडणे नको, जनतेची कामे करा : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 1:58 PM

जिल्हा परिषदेत अध्यक्ष तसेच पदाधिकाºयाचे आपसातील भांडण चव्हाटावर आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांचे कान टोचण्याचे काम रविवारी केले.

ठळक मुद्देगिरीश महाजनांनी टोचले कानठेकेदार अधिकाऱ्यांचे होणार ‘आॅपरेशन’कारवाईकडे लागले सर्वांचेच लक्ष

जळगाव : जिल्हा परिषदेत अध्यक्ष तसेच पदाधिकाºयाचे आपसातील भांडण चव्हाटावर आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांचे कान टोचण्याचे काम रविवारी केले. आपसात भांडणे करण्यापेक्षा जनतेची कामे करा, निधी कमी पडल्यास शासनाकडून तो मिळवून देणार असेही आश्वासन त्यांनी दिले. याचबरोबर जिल्हा परिषदेत ठेकेदारी करणाºया अधिकाºयांची उचलबांगडी करण्याचे संकेतही त्यांनी दिले.जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यातील बेबनाव वेळोवेळी पुढे येत गेला. आपसातील वादामुळे विकास कामांवरही परिणाम होत राहिला. यात काही सदस्यही आपसात वाद घालण्यात मागे राहिले नाही. यामुळे अधिकारी वर्गासही फावले. काहींनी आपली मनमानी सुरु केली. या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांंनी या पदाधिकाºयांची बैठक जि.प.अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी सायंकाळी घेतली.यावेळी जि.प.अध्यक्ष उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण यांचेसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व काही पदाधिकारी उपस्थित होते.कारवाईकडे लागले सर्वांचेच लक्षगिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाºयांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे पुढे कोणला काय फटका बसतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.अधिकाºयांवर अंकुश राहिलेला नाहीपदाधिकाºयांच्या आपसातील वादामुळे जिल्हा परिषदेतील अधिकाºयांवर कोणाचा अंकुश राहिलेला नाही. काही अधिकारी ठेकेदारी करीत आहेत. याचबरोबर मनमानी कारभारही वाढला आहे. काहींनी तर शौचालयाच्या कामांचेही ठेके घेतले असून काही अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याचेही महाजन म्हणाले. यामुळे आपल्यालच आता लक्ष घालावे लागणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेत ‘विशेष सर्जरी’ मोहीम आपण राबविणार असून अधिकाºयांशी लवकरच चर्चा करणार आहे. काहीची बदल तर काहींची खांदेपालट करावी लागेल, असे संकेतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद