शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

महिलांनो बिनधास्त करा रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दोन वर्षांची कोविडच्या काळातीलही आकडेवारी बघितली असता या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दोन वर्षांची कोविडच्या काळातीलही आकडेवारी बघितली असता या ठिकाणी सर्वाधिक रक्ताची गरज ही गर्भवती महिलांना लागली आहे. सिझेरीयनच्या ६० टक्के आणि सामान्य प्रसुती होणाऱ्या ५० टक्के महिलांना रक्त द्यावे, लागते अशा स्थितीत रक्तपेढ्यांमधील ६० ते ७० टक्के रक्त हे महिलांसाठी लागत असते. त्यामुळे हिमोग्लोबीनची पातळी चांगली असलेल्या महिलांनी रक्तदानात पुढाकार घ्यावा व रक्तसाठा वाढविण्यासाठी योगदान द्यावे, किमान दुसऱ्या महिलेसाठी तरी एका महिलेने पुढे यावे, असे आवाहन तज्ञांकडून केले जात आहे.

रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र ते त्यांनी दूर करून यात पुढाकार घेतला पाहिजे, असेही डॉक्टर सांगतात. महिलांचे गैरसमजामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. पुरूषांच्यात तुलनेत महिलांचे रक्तदानाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास, रक्ताचा साठा वाढू शकेल, शिवाय आता नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर रक्ताची मोठी गरज भासणार असून तुडवडा निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनीच दुसऱ्यांच्या जीव वाचविण्यासाठी आता पुढे यावे. असे आवाहन विविध क्षेत्रातून केले जात आहे.

१ ते ३ बॅग पर्यंत लागते रक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२० मध्ये ११६१ महिलांची प्रसुती झाली. दरम्यान, ५७० महिलांचे सिझेरीयन झाले आहे. महिलांना प्रसुतीदरम्यान हिमोग्लोबीनची पातळी योग्य राखण्यासाठी महिलांना रक्तद्यावे लागते. यात एक ते तीन बॅग पर्यंत रक्त द्यावे लागते, त्यामुळे रक्ताची खरी गरज या ठिकाणी असते, अशा स्थितीत लवकर रक्त उपलब्ध न झाल्यास महिलेच्या जीवाला धोका असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

रक्तदानाविषयी तज्ञ काय म्हणतात...

रक्तदानामुळे तुम्हाला अशक्तपणा येत नाही, तुम्ही आजारीही पडत नाही. प्रत्येक सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्याने रक्तदान करू शकतो. तुम्हाला नवीन रक्त शरीरात तयार झाल्याने एक ऊर्जा मिळते. -डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी

रक्तदानाने तुम्हाला ऊर्जा मिळते. तुमच्या शारीरिक नियमिततेला कुठलीही बाधा पोहचत नाही. तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे रक्त कमी होईल, मी अशक्त होईल, हा गैरसमज बाळगू नये.- डॉ. मारोती पोटे, उपअधिष्ठाता, जीएमसी

महिलांनीही रक्तदानात पुढाकार घ्यावा, रक्तदानामुळे तुम्हाला कसलाच त्रास होत नाही, तुमच्या शरीरात नवीन रक्त तयार झाल्याने रक्तभिसरण उत्तम राहते, तुम्ही निरोगी राहतात. गरोदर महिलांना सर्वाधिक रक्त लागत असते. सर्व गैरसमज दूर ठेवून रक्तदान करावे. - डॉ.संजय बनसोडे, स्त्री रोग विभाग प्रमुख,

तुमच्या रक्तदानाने दुसऱ्याचा जीव वाचतो हे एक आत्मिक समाधान तर असतेच शिवाय तुमचे रक्त शुद्ध होते, नवीन रक्त तयार होते, तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते. दर तीन महिन्यांनी तुम्ही रक्तदान करू शकतात तर कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर तुम्ही १४ दिवसांनी रक्तदान करू शकतात.- डॉ. नलिनी वैद्य, प्रमुख, गोळवलकर रक्तपेढी.