शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

रात्री आठ वाजण्यापूर्वीच साजरा करावा लागणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करता, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाचा विचार करता, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठ वाजण्यापूर्वी जयंती साजरी करावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग वाढल्याने सर्वच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होत आहे. गेल्यावर्षीही अनेक धार्मिक कार्यक्रम व राष्ट्रपुरुषांच्या जयंती साधेपणाने साजरा कराव्या लागल्या होत्या. यावर्षीही कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवावरही त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता एकत्र न येता अत्यंत साधेपणाने सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभातफेरी, रॅली टाळा

दरवर्षीप्रमाणे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्याठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी पाचपेक्षा जास्त नसावी, सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जयंती साजरी करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चैत्यभूमी, दादर येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभूमी येथे न जाता घरातून अभिवादन करावे, असेही आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, त्याऐवजी या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे, रक्तदान करावे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी, नियमांचे काटेकोर पालन करावे, असे सुचविण्यात आले आहे.

या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेही पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.