शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसामुळे पक्व बोंडे पडताहेत काळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:18 IST

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, विद्यार्थी सर्रास शेतावर जात आहेत. मागील आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. पुन्हा २० तारखेपासून पावसाचा ...

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, विद्यार्थी सर्रास शेतावर जात आहेत. मागील आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली. पुन्हा २० तारखेपासून पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. अधून-मधून डोक्यावरचे ढगांचे ढिगार तुटून पडत आहे. अशातच कपाशीच्या झाडावर आहे ती काळी बोंडे, कवडी कापूस शेतातून घरात आणण्यासाठी मोठी कसरत होत आहे. वेचणीस अधिक खर्च येत आहे. निघणाऱ्या या कापसातून वेचणीचा खर्चदेखील निघणार नाही त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. अतिपावसाने कपाशीच्या झाडावरच कैऱ्या सडल्या. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार बागायती कपाशीवर पंचवीस -तीस ते साठ-सत्तर अशा कैऱ्या आहेत. काळ्या पडलेल्या कैऱ्यांना डब्बा म्हटले जाते. असा कापूस व कवडी वेचण्यास अधिक वेळ लागतो. मागील आठवड्यात बऱ्याच क्षेत्रावरील कपाशीची बोंडेदेखील फुटली आहेत. अशा ठिकाणी कापसाची पहिली वेचणी सुरू झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत १५० रुपये तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २०० रुपये रोज कवडी कापसाच्या वेचणीला आहे. एक मजूर मोठ्या मुश्किलीने दहा-विस किलो कापूस वेचतो. पहिल्या वेचणीचा माल वजनदार असतो. एक किलो कापूस वेचणीला पाच, सहा, सात रुपये मोबदला मिळतो. एक सशक्त मजूर तीस, पन्नास किलो तर क्विंटललादेखील हात लावतो. परंतु किलोप्रमाणे कापूस वेचणारे मजूर यावर्षी अद्याप कपाशी चांगली फुटलेली नसल्याने रोजंदारीनेच वेचणीला येत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत. शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांच्या घरात एकच मोबाइल पालंकाकडे असतो.आई-वडील शेतावर कापूस वेचणीला गेल्यानंतर अशा घरातील शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग होत नाही. शिवाय मोबाइलला नेटचा रिचार्ज करायलादेखील पैसे नाहीत. म्हणून विद्यार्थी कापूस वेचणीला जात आहेत.यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीला मदत होत आहे.

चौकट-- यंदा दिवाळीआधीच वाजणार कापसाचे दिवाळे

मान्सूनपूर्व अर्थात बागायती कापसात अतिपावसाने दुसरा बहार जमिनीवर पडला तर पहिल्या बहारातील पक्व बोंडे सडली. आता ही कपाशी पिवळी, लाल पडून पाने करपू लागली आहेत. गळू लागली आहेत. पुन्हा ती हिरवी होईल का नाही? झाली तरी बहार केव्हा लागेल? शेंदरी बोंडअळीची धास्ती आहेच. यामुळे असे क्षेत्र लवकर खुर्राट (उलगवाडी) होणार आहे. हे क्षेत्र सर्वाधिक आहे. दिवाळी अजून एक-दिड महिना दूर आहे तोवर या कापसाला उपटून फेकावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. एरव्ही दिवाळीनंतरदेखील दीड-दोन महिने कापूस वेचणीचा हंगाम चालतो. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांना तर मजुरांच्या हातांनादेखील बराच दिवस कापूस वेचणीचे काम मिळत असे. यंदा तशी स्थिती नाही.