शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जागेच्या वादात बुजल्या गटारी

By admin | Published: July 09, 2017 1:15 AM

औद्योगिक वसाहतीतील समस्या : सांडपाणी साचल्याने पसरली दुर्गंधी

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : औद्योगिक वसाहतीतील एम़ सेक्टर भागातून  बाहेर जाणाºया सांडपाण्याच्या गटारी वसाहतीला लागूनच असलेल्या शेतातून काढल्याने शेतमालकांनी त्या बुजून टाकल्या आहेत़ जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या या वादामुळे या गटारींवरील खर्च वाया गेल्याचेच दिसत आहे़    या गटारी बुजल्याने एम़ सेक्टर भागात साचत असलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे़ त्याचा त्रास  उद्योजकांसह कामगारांनाही सहन करावा लागत आहे़ ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास यातून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे़ गेल्या २० वर्षांच्या काळात पहिल्यांदा जळगाव औद्योगिक वसाहतीत रस्ते व गटारी होत आहेत़ उद्योजकांकडून मिळणाºया करातून ही विकास कामे केली जातात़ त्यामुळे या कामांमध्ये नियोजन व उत्कृष्टता असायला हवी होती, अशी अपेक्षा उद्योजकांमधून व्यक्त होत आहे़ काही महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीत गटारी व रस्त्यांची कामे सुरू आहेत़ मात्र या कामांमध्ये व्यवस्थापन व उत्कृष्टता नसल्याची तक्रार उद्योजकांनी अनेकवेळा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांकडे तोंडी व लेखी स्वरूपात केली आहे़ २१ एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या़ मात्र त्यानंतर चौकशीसाठी आलेल्या जिल्हाधिकाºयांपर्यंत महामंडळाच्या अधिकाºयांनी आमच्या समस्या पोहचूच दिल्या नसल्याचा संताप उद्योजकांनी व्यक्त केला आहे़ एम़ सेक्टर भागात गटारींचे काम करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने गटारींना नैसर्गिक प्रवाह (स्लोप) मिळालेला नाही़ गटारी बांधकाम केलेल्या शेताच्या मालकांशी समन्वय न साधल्याने व कागदपत्रांची तपासणी करून कामे न केल्याने या कामावरील झालेला खर्च तृर्तास तरी वायाच गेल्याचे दिसत आहे़ वसाहतीत १६ किमी़ पर्यंतच्या गटारी उभारण्यात आल्या आहेत़ पाणी काढण्याची व गटारींमधील काडी-कचरा साफ करण्यासाठी चार ते पाच कर्मचाºयांची व्यवस्था केली असल्याचे औद्योगिक वसाहत कार्यालयाचे तत्कालीन उपअभियंता जयंत पवार यांनी सांगितले होते़  त्यानुसार नव्याने आलेल्या अधिकाºयांनी तात्पूर्ती आवश्यक कामे करीत असल्याचे सांगितले़ पावसामुळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते, त्यामुळे दोन-तीन दिवस उद्योजकांसह कामगारांनाही त्रास सहन करावा लागला होता़

 

नियोजनशून्यतेमुळे वायफळ खर्चएम़ सेक्टर मधील तुकाराम नारखेडे यांच्या प्लॉटमधून पाईप टाकून व पुढे सतीश भोळे, नेमाडे व खडके या शेतकºयांच्या शेताला लागून कंत्राटदाराने पाणी काढण्यासाठी गटारीचे बांधकाम काम केले, मात्र या शेतकºयांनी या बांधकामाला विरोध करत मोजणी करून काम करण्याची तक्रार केली़ मात्र तरीही दरम्यानच्या काळात बांधकाम पूर्ण करण्यात आले़ तरी कोणताही निर्णय न झाल्याने, संबंधित शेतकºयांनी शेतीच्या मशागतीची कामे करायची म्हणून, जेसीबी मशिनच्या साहाय्याने माती लोटून या गटारी बुजून टाकल्या आहेत़ या गटारी बुजताना अनेक ठिकाणी गटारींचे कठडेही तुटल्याचे दिसत आहे़