शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस जोरात, ७ बोगस डॉक्टरांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:11 AM

स्टार ८४९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोविडच्या महामारीच्या काळातही बोगस डॉक्टरांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. या कालावधीत विविध ...

स्टार ८४९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात कोविडच्या महामारीच्या काळातही बोगस डॉक्टरांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. या कालावधीत विविध तालुक्यांतून ७ बोगस डॉक्टरांच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. दरम्यान, याबाबत समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत चौकशी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कोविडच्या काळात बोगस डॉक्टरांवरील कारवाईचा मुद्दा दुर्लक्षित राहत आहे.

ज्यांच्याकडे योग्य शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र नाही किंवा कंपाउंडरची कामे करून डॉक्टरांप्रमाणे औषधोपचार करणाऱ्यांविरोधात बोगस वैद्यकीय व्यावसायिक कारवाई समितीमार्फत कारवाई केली जात आहे. दरम्यान, बोगस डॉक्टरांच्या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे की आणखी काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आरोग्य विभागाकडे याबाबत माहितीच अद्ययावत नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे बोगस डॉक्टरही पळवाटा काढून यातून बाहेर पडून आपला व्यवसाय सुरूच ठेवत आहेत.

तालुकानिहाय प्राप्त तक्रारी

भडगाव २

पाचोरा १

जामनेर २

चोपडा १

चाळीसगाव १

कोविड काळात झालेल्या कारवाई

०३

जिल्हाभरातून प्राप्त तक्रारी

०७

तक्रार आली तरच कारवाई

बोगस डॉक्टरांच्या बाबतीत काही तक्रारी आल्या तरच समितीला याबाबत चौकशीचे आदेश दिले जातात. अन्यथा यात कारवाई होत नाही. शिवाय तक्रारी आल्या तरी चौकशीत पळवाटा शोधून हे डॉक्टर सुटतात, असेही सांगितले जात आहे.

सर्वसामान्यांच्या जिवाशी होऊ शकतो खेळ

कोविडच्या काळात दक्षता हवी

१ कोविडच्या काळात योग्य उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा वेळी योग्य डॉक्टरांकडून उपचार न घेतल्यास जिवावर बेतू शकते, त्यामुळे नागरिकांनी प्रमाणित डॉक्टरांकडूनच सल्ला घेऊन योग्य उपचार पद्धती अवलंबणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मनुष्यबळ कमी

२ जिल्हाभरात कोविडचे मोठे संकट असून यात आरोग्य यंत्रणा व्यस्त आहे. त्यात मनुष्यबळ कमतरता असल्याने कारवाईकडे लक्ष देण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यानेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोविडमधून उसंत मिळाल्यानंतर अन्य आरोग्याच्या कारवाया होऊ शकतील, असे काहींचे मत आहे.

समितीकडे अधिकार

३ या समितीमध्ये गटविकास अधिकारी हे अध्यक्ष तर तालुका वैद्यकीय अधिकारी हे सचिव असतात. तक्रारी आल्यानंतर आरोग्य विभागाकडून संबंधित डॉक्टराच्या चौकशीचे आदेश देण्यात येतात. त्यानुसार चौकशी करून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल देण्यात येत असतो.