शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शेतकऱ्यांना सोसायट्यांमार्फतच मिळणार कर्ज; आधीचा निर्णय रद्द

By सुनील पाटील | Published: April 15, 2023 7:13 PM

ऊस उत्पादकांनाही हमी पत्राची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतकऱ्यांना आता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फतच कर्ज मिळणार असून त्यातील ५० टक्के कर्ज रोखीने तर ५० टक्के एटीएमद्वारे काढता येणार आहे. ऊस उत्पादकांनाही विना हमीपत्र कर्ज वितरणासह जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, परंतु ज्यांची शेती शेजारच्या जिल्ह्याच्या हद्दीत आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्ज पुरवठा केला जाणार आहे. हे तीन महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने शनिवारी घेतली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची तहकुब बैठक शनिवारी चेअरमन संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पवार यांची चेअरमन निवडीनंतरची ही पहिलीच बैठक होती. व्हाईस चेअरमन अमोल पाटील, आमदार एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, राजीव देशमुख, ॲड. रोहीणी खडसे-खेवलकर, आमदार चिमणराव पाटील, आमदार अनिल पाटील, ॲड.रवींद्र पाटील, जनाबाई महाजन यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज देताना कारखान्याचे हमी पत्र आवश्यक होते. १५ वर्षापूर्वी बँकेने तसा निर्णय घेतलेला होता. आता साखर कारखाने खासगी तत्वावर चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्याशिवाय जिल्ह्यातील रहिवाशी शेतकऱ्यांच्या जमीन लगतच्या धुळे, औरंगाबाद, अकोला या जिल्ह्यातील गावांमध्ये आहे. त्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारण्यात येत होते. हे दोन्ही निर्णय देखील बँकेने रद्द केले आहेत. ज्या शेतकऱ्यांना थेट बँकेमार्फत कर्ज घ्यायचे असेल तर ती देखील मुभा देण्यात आली आहे.

‘त्या’ घोषणेची अमलबजावणी कराविकासो बळकटीकरणासाठी गट सचिवांचा पगार बँकमार्फत करण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण व चेअरमन संजय पवार यांनी चेअरमननिवडीच्या दिवशी केली होती. या घोषणेची आठ दिवसात अमलबजावणी करावी अशी अपेक्षा खडसे व आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

उध्दव ठाकरेंच्या सभेला जाणारउध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे २३ रोजी सभा होत आहे. महाविकास आघाडी या नात्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सहकार्य करेल तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सभेला जातील, असे खडसे यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Farmerशेतकरी