शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मूल्यमापन सूत्रामुळे बारावीत कमी गुण मिळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:19 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी काही ठिकाणी परीक्षा झाल्या तर काही ठिकाणी परीक्षा देखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सुत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास कमी गुण मिळण्याची शक्यता असल्याची भीती बारावीच्या विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली़ त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते़ राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३०,३०,४० हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबत विद्यार्थी व पालकांची मते ‘लोकमत’ने जाणून घेतली. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले़ पुढे बारावीचे वर्ष महत्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे़ त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

मूल्यमापनाचे सूत्र

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाचा सुत्रात समावेश आहे.

- पालक काय म्हणतात

असे गुण देणे योग्य नाही. परीक्षा होणे आवश्यक होते़ कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. बारावीच्या मूल्यमापनामुळे कमी गुण सुध्दा मिळू शकतील.

- रामचंद्र पाटील, पालक

------

भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये़ आॅफलाइन नव्हे तर आॅनलाइन तरी परीक्षा घेण्यात आली असती तर बरे झाले असते़ विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झाली होती. त्यामुळे पुन्हा विचार व्हावा.

-ईश्वर चौधरी, पालक

------

- काय म्हणतात विद्यार्थी

अकरावीत असताना बारावीच्या परीक्षेकडे अधिक लक्ष देवून अभ्यास केला. त्यामुळे अकरावीतील कमी गुणांमुळे बारावीच्या निकालावर परिणाम होवू शकतो. काही दिवस थांबून बोर्डाने परीक्षा घेणे गरजेचे होते.

- सिध्देश्वर पाटील, विद्यार्थी

-----

कमी गुणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचेल़ आताही बोर्डाने विचार करून आॅनलाइन व आॅफलाइन दोन्ही पध्दतीने परीक्षा घ्याव्या. त्यातचे प्रोजेक्टचे सुध्दा गुण दिले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा व प्राजेक्टचे गुणांची सरासरी काढून निकाल देण्यात यावा.

-अनंत धारणे, विद्यार्थी