शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

By सुनील पाटील | Published: August 22, 2023 6:53 PM

नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता : मनपाच्या उद्यानात वापरणार खत

जळगाव : गेल्या दीड वर्षापासून लालफितीत अडकलेल्या कचरा प्रकल्पाचा मंगळवारी मुहूर्त गवसला. कचऱ्यावर प्रकिया करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून तयार होणारे खत महापालिकेचे उद्यान, ऑक्सिजन पार्क आदी ठिकाणी वापरले जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागातील रहिवाशांची धूर व दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे.

महानगरपालिकेच्या आव्हाणे शिवारातील जागेत खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण शहरातून संकलित होणारा कचरा या याठिकाणी आणला जातो. आजच्या घडीला तीन लाख क्युबिक मीटर कचरा साचलेला आहे. कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीला काम देण्यात आले असून मंगळवारी कचऱ्यापासून खत प्रक्रिया करण्याच्या कामाला सुरुवात झाली. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते नारळ वाढवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विद्या गायकवाड, उपायुक्त अश्विनी गायकवाड, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले व पाणीपुरवठा उपअभियंता संजय नेमाडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामास मागील महासभेत मान्यता देऊन कार्यादेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार या कामाचे मक्तेदार कोर इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यांच्याकडून काम सुरुवात करण्यात आलेली आहे. या कामी त्रयस्त यंत्रणा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून देखील प्राथमिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. कामाचे क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे.

तीन लाख क्युबिक मीटर कचराप्रकल्याच्या ठिकाणी आज तीन लाख क्युबिक मीटर कचरा असून पहिल्या टप्प्यात १ लाख ६७ हजार क्युबिक मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे कार्यादेश मक्तेदाराला देण्यात आले आहे. सहा महिन्यात संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. यातून तयार होणारे खत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव