शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:49 AM

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे.

जळगाव : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाईल वर बोलल्यास पहिल्यावेळी पाचशे रुपये तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयाचा दंड आकारला जात आहे. जिल्ह्यात नवीन कायदा लागू झाल्यानंतर जानेवारी ते फेब्रवारी या दोन महिन्यात ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणाऱ्या ४११ जणांकडून ४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे. केंद्र सरकारने ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट, वाहतूक नियमांची पायामल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये दंड वाढवण्यात आला. त्यामध्ये पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्यात येणार असल्याची तरतूद केली आहे

मोबाईलच्या किमतीएवढा दंडना लायसन्स वाहन चालविले तर आता चालकाला थेट पाच हजाराचा तर लायसन्स अपात्र केलेले असेल तर थेट दहा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालविले असेल तसेच लायसन्सची मुदत संपलेली असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. अग्निशमन बंबाला जागा करुन दिली नाही तर दहा हजाराचा दंड भरावा लागतो. या दंडाच्या रकमेत नवीन मोबाईल मिळू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करणेच योग्य आहे.

कोणत्या प्रकारात किती दंड वसुली?भरधाव वेगाने वाहन चालविणे : १२,१३०००सीट बेल्टचा वापर न करणे : २००४००दुचाकीवर तीन सीट : १५,४३०००लायसन्स जवळ न बाळगणे : १३४४५००

पोलीस नाहीत म्हणून मोबाईलवर बोलला आणि कॅमेराने टीपलाबरेच वाहनधारक वाहन चालविताना बिनधास्तपणे मोबाईलवर बोलतात. काही ठिकाणी पोलीस नाहीत असे वाटते तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले की मोबाईल काढून खिशात ठेवतात, नंतर पुढे गेले की लगेच मोबाईलवर बोलणं सुरु होते. यामुळे कारवाईतून आपली सुटका झाली असा समज वाहनधारकांचा असतो, मात्र तसे नाही तुम्हाला आता न अडविताही मोबाईल कॅमेऱ्यातून पोलीस कैद करु शकतात व तसे प्रकार आता होऊ लागले आहेत.

हेल्मेटचा नियम नावालाचहेल्मेट न वापरणाऱ्या १ हजार ३३९ वाहनधारकांवर जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वेगवेगळ्या कलमाखाली ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आता मोटार वाहन कायदा ११२/१८३ मध्ये सुधारणा करुन दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे. त्यातून स्वत:ला शिस्त लागते, शिवाय अपघाताचा धोका टळतो.वेगाने वाहन चालविल्यास दोन हजाराचा तर मोबाईलवर बोलताना वाहन चालविल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.-लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

टॅग्स :JalgaonजळगावcarकारMobileमोबाइल