शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
2
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
3
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
4
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
5
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
6
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
7
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
8
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
9
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
10
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
11
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
12
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
13
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
15
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
16
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
17
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
19
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
20
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 

जळगाव : तीन वर्षांपासून राज्य शासनाचे आदर्श शेतकऱ्यांचे पुरस्कार रखडले

By ajay.patil | Published: April 03, 2023 6:25 PM

शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो.

जळगाव - शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अन्य शेतकऱ्यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकऱ्यांचा राज्य कृषी विभागाच्या वतीने वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारात या पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांचे वाटपच झाले नसून, जिल्हा कृषी विभागाने पाठविलेले तीन वर्षांपासूनचे प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडून आहेत.

जळगाव जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, शेतकरी आपले प्रस्ताव तयार करून, जिल्हा कृषी विभागाकडे पाठवीत आहेत, तर कृषी विभागदेखील हेच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवीत आहेत. मात्र, राज्य शासनाला कृषी पुरस्कारांसाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकरी जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे काम करत आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपनीच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतीत आगळेवेगळे काम सुरू ठेवले आहे. अशा शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने १३ प्रकारांत पुरस्कार दिले जात असतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत.

या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण नाही...

२०१९-२०२०२०-२१

२०२१-२२

२०१८-१९ चे पुरस्कार २०२१ मध्ये करण्यात आले वितरित

२०१७, १८ व १९ या तीन वर्षांतदेखील पुरस्कार रखडले होते. मात्र, ३१ मार्च २०२१ रोजी हे पुरस्कार महाविकास आघाडीच्या काळात वितरित करण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यातील तीन, तर जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश होता. मात्र, त्यानंतर तीन वर्षांपासून कृषी विभागाकडून केवळ प्रस्ताव जमा करून, ते राज्याकडे पाठविण्यात येत आहेत. राज्य शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. यंदाही प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव देणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र पुरस्कार कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले आहे.

कृषी विभागाकडे ज्या शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते ते प्रस्ताव कृषी विभागाकडून राज्य स्तरावर पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील.-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक