शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

मोठ्या संकटाला घालविण्यासाठी आघाडीची गरज : भारत पाटणकर

By सुनील पाटील | Published: July 01, 2023 4:49 PM

भारत जोडो अभियानाच्या संमेलनाला सुरुवात

जळगाव : स्वप्नात जगायला, स्वप्न बघण्याच्या अधिकारावर आज गदा आलेली आहे, अशा पध्दतीची हुकूमशाही, हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठे संकट घालविण्यासाठी सर्व मिळून आघाडी बनविण्याची गरज आहे आणि या आघाडीला निवडून आणावे, असे आवाहन डॉ.भारत पाटणकर यांनी शनिवारी भारत जोडो अभियानातंर्गत कार्यकर्ता संमेलनात केले.

भारत जोडो अभियानातंर्गत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळील विनूज वर्ल्ड येथे कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात अध्यक्षीय भाषणात पाटणकर बोलत होते. व्यासपीठावर सुभाष वारे, चंद्रशेखर शिखरे, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, करीम सालार, लीना पवार, विजय महाजन (दिल्ली), अजित झा, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), एच.एम.देसर्डा, फैजल खान आदी उपस्थित होते. नांगर पूजन व शिवरायाच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन संमेलनाचे उद‌्घाटन झाले. पाटणकर पुढे म्हणाले की, नवा भारत निर्माण करण्यासाठी सजग राहण्याची गरज असून भारत जोडो सोबत माणूस जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यापेक्षा चार पट मोठे संमेलन घेऊ, महिनाभरात त्यासाठी समित्या स्थापन करु असेही त्यांनी नमूद केले.

समाजात भांडण लावण्याचे षडयंत्रसध्या समाजासमाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जातीय दंगली घडवून आणल्या जाताहेत. जगण्याची साधणं हिसकावली जात आहेत. गरीब अधिक गरीब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे. त्यावरुन षडयंत्र समजून घ्या, असे आवाहन सुभाष वारे यांनी केले.  १९५० मध्ये खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाला. त्याआधी फक्त २२ टक्के लोकांनाच मतदान करता येत होते. १९५० मध्ये संविधानाने स्वातंत्र्य दिले अन‌् झोडतीला माणूस मतदान करु लागला. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाच्या प्रारंभी शाहीर रमेश धुरंधर यांनी क्रांती गीत सादर केले. रविवारी संमेलनाचा समारोप होणार आहे. राज्यासह परराज्यातील प्रतिनिधी यात सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJalgaonजळगाव