शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
2
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
3
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
4
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
5
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
6
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
7
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
8
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
9
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
10
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?
11
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
13
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
14
कॉलेजमध्ये शिक्षणासोबत मिळणार नोकरी आणि पैसे; UGC नं तयार केला जबरदस्त प्लॅन
15
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
16
'गूडन्यूज' चा योग! पुन्हा Ajinkya Rahane साठी फायद्याचा ठरणार? Rohit Sharma आउट झाला तर...
17
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
18
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
19
Rafael Nadal च्या या खास अंदाजामुळे MS धोनीही झाला त्याचा 'जबरा फॅन' (VIDEO)
20
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात

जळगाव जिल्ह्यात भूजल पातळीत १.४० मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:12 AM

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या जळगाव जिल्ह्याला दोन वर्षांपासून दिलासा मिळत असून यंदाही भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी १.४० मीटरने वाढली असून सर्वाधिक ४.५२ मीटरची वाढ यावल तालुक्यात झाली आहे तर सर्वात कमी ०.०२ मीटरने एरंडोल तालुक्यात पातळी वाढली आहे. १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात १.०५ मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात भूजल पातळीचे सर्वेक्षण केले जाते. जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते. यावर्षी मे महिन्यात केलेल्या भूजल सर्वेक्षणात जिल्ह्यातील चोपडा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात भूजल पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या पाच वर्षांची तुलना पाहता यंदा ही वाढ झाली असून गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा मान्सूनपूर्व सर्व्हेक्षण झाले असून या नंतर अजून मान्सून पश्चात सर्व्हेक्षण होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर आणखी वाढ दिसून येण्याची आशा आहे.

यंदा झालेल्या सर्वेक्षणानुसार यावल तालुक्यात सर्वाधिक ४.५२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्या खालोखाल मुक्ताईनगर तालुक्यात ३.६० मीटर, रावेर तालुक्यात ३.१२ मीटर, जळगाव तालुक्यात १.७६ मीटर, बोदवड तालुक्यात १.५७ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. या सोबतच अमळनेर तालुक्यात १.४६ मीटर, धरणगाव तालुक्यात १.१४ मीटर, पाचोरा तालुक्यात १ मीटर, भुसावळ तालुक्यात ०.९२ मीटर, जामनेर तालुक्यात ०.३९ मीटर, भडगाव तालुक्यात ०.२७ मीटर, चाळीसगाव तालुक्यात ०.१६ मीटर, पारोळा तालुक्यात ०.०६ मीटर, एरंडोल तालुक्यात ०.०२ मीटरने भूजल पातळी वाढली आहे.

चोपडा तालुक्यात भूजल पातळी घटली

जिल्ह्यातील १४ तालुक्यात भूजल पातळी वाढली असली तरी चोपडा तालुक्यात ही पातळी १.०५ मीटने घटली आहे. यंदा भूजल पातळीत घट झालेल्या या तालुक्यात मे महिन्यातील मान्सूनपूर्व सर्व्हेक्षणात २.०४ मीटरने वाढ झाली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही या तालुक्यात भूजल पातळीत घट झाली आहे.

------------

गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. आता मान्सून पश्चात सर्वेक्षणात आणखी आकडेवारी पुढे येईल.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भू वैज्ञानिक