शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भुलाबाईचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:15 AM

लोकमत वीकेंड स्पेशलमधील मैथिली पवनीकर यांचा लेख-

सर्व मुलींना विचारले, की तुमचा आवडता सण कोणता? तर सर्वाचे एकच उत्तर येईल ते म्हणजे भुलाबाईचा सण. ‘भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला’ या गाण्यातूनच मुली व महिलांचा उत्साह आपल्याला दिसून येतो. जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला अकादमीतर्फे गेल्या 14 वर्षापासून भुलाबाई महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. भुलाबाई महोत्सवानिमित्त पारंपरिक स्त्री गीतांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रय} केला जात आहे. भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच गणपती विसजर्नाच्या दुस:या दिवशी भुलाबाईंचे आगमन होते. भुलाबाईची सजावट करताना पण आम्हाला छान वाटते. आम्ही थर्माकोलचे मखर लावतो. तसेच त्याभोवती विद्युत रोषणाई चमकते. रोज संध्याकाळी आजूबाजूची विविध फुले तोडून आणतो आणि हार तयार करतो. महिनाभर चालणा:या या उत्सवाने आमच्या घरातदेखील उत्साहाचे वातावरण असते. आम्हाला भुलाबाई हे नावच सुरुवातीला मोठे गमतीशीर वाटायचे. यावर आईने सांगितले की, भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे शंकर याचे प्रतीक असे मानले जाते. पार्वती पौर्णिमेला माहेरी येते एक महिना थांबून कोजागिरी पौर्णिमेला सासरी जाते, अशी दंतकथा आहे. या एक महिन्यात रोज संध्याकाळी भुलाबाईंच्या स्तुतीची गाणी टिप:यांच्या तालावर म्हटली जातात. गाणी झाली की, खरी मजा असते ती खाऊची. फक्त खाऊ खायचा असे नाही तर तो ओळखावा लागतो. त्यासाठी प्रत्येकीमध्ये चढाओढ लागली असते. रोज नवीन नवीन खाऊ यानिमित्ताने आम्हाला खायला मिळतो. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या पदार्थाची नावे व चवी आम्हाला कळतात. त्यामुळेच भुलाबाईचा उत्सव आम्हा मुलींना विशेष आवडतो. कारण महिनाभर गाणी, नाच व खाऊ अशी धम्माल आम्ही करीत असतो. भुलाबाईची गाणीसुद्धा मोठी गमतीशीर आहे. त्यातून फारसा अर्थ निघत नाही. केवळ यमक जुळवून ही गाणी तयार केली आहे. उदा.. अडकीत जावू बाई खिडकीत जावू । खिडकीत होता झोपाळा, भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवू गोपाळा।। किंवा यादवराया राणी बैसली कैसी। सासुरवासी सुनबाई घरात येईना कैसी।। अशी बरीच गाणी भुलाबाईंची आहेत. या गाण्यातून तिचे माहेरविषयीचे प्रेम आणि सासरच्या तक्रारी दिसून येतात. तर काही गाणी फारच हास्यास्पद आहे. ही गाणी म्हणताना तर आमची हसता हसता पुरेवाट होते. भुलाबाईचा शेवटचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी गोड, आंबट-गोड, नमकीन अशा चवीचे पदार्थ तसेच विविध फळे असतात. आईच्या मैत्रिणी त्यांच्या मुलांना व भुलाबाईला घेऊन एका ठिकाणी जमतो. मग आधी भुलाबाईची गाणी आम्ही म्हणतो तसेच टिप:या खेळतो आणि मग खाऊचा फडशा पाडतो. मी दरवर्षी आईसोबत भुलाबाई महोत्सवाला न चुकता जात असते, कारण तिथे मला एकापेक्षा एक छान भुलाबाईंची गाणी ऐकायला मिळतात. केश्वस्मृतीमुळे हा छोटय़ा सणाला महोत्सवाचे रूप आलेले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही हा पारंपरिक वारसा चालवू, याची मला खात्री आहे.