शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

चिमुरड्यांसह गृहिणी खूश्श...संस्थाचालक मात्र नाखूश; दुसरीपर्यंतच्या शाळा भरणार सकाळी ९ वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 5:52 PM

वर्गखोल्यांचा ताळमेळ घालण्यासाठी करावी लागणार कसरत

- कुंदन पाटील

जळगाव : बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेपासून भरवण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर चिमुरड्या विद्यार्थ्यांसह गृहिणींनी आनंदल्या असून संस्थाचालक आणि शाळा व्यवस्थापन मात्र या निर्णयामुळे नाखूश असल्याचे दिसून आले आहे.

राज्यापाल रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सोमवारी केली. या निर्णयानंतर दुसऱ्यादिवशी विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनात पडसाद उमटले.

शाळांची कोंडीबहुतांशी शाळा दोन सत्रात भरविल्या जातात. पहिली ते ७ आणि आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या सत्रात भरविले जातात. वर्गखोल्यांची उपलब्धता पाहून काहींनी हा पर्याय निवडला आहे. आता दुसरीपर्यंतचे वर्ग़ सकाळी ९ वाजेपासून भरणार असल्याने शाळाखोल्यांची उपलब्ध करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

मी काय म्हणते...सकाळी पोरं उठत नाहीत. त्यातच त्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करताना कसरत होते. तशातच शाळेत न्यायला रिक्षा दारात धडकते.त्यामुळे अनेकदा कोंडी होते. मात्र आता सकाळी ९ वाजेची वेळ झाल्याने सर्वच अडचणी दूर होणार आहे.-शुभांगी बारी, गृहिणी.

खरं आहे पण...या निर्णयाला विरोध नाही.मात्र दोन सत्रात शाळा भरविणाऱ्यांची अडचण होणार आहे. नऊऐवजी आठ वाजेची वेळ केली असती तर योग्य राहिले असते. या वेळेत कायमस्वरुपीपेक्षा ऋतूमानानुसार बदल करायला हवा होता.-मनोज पाटील, संस्थाचालक.

ऐका ना...मुलांच्यादृष्टीने निर्णय योग्य आहे. शाळेत पुरेशी सोय नसते म्हणून त्यांचे सकाळचे विधी घरीच पूर्ण करावे लागतात. म्हणून साडेसात किंवा आठवाजेपासून शाळेची वेळ निश्चीत केली असते तर चांगले राहिले असते. कारण सकाळच्या नऊ वाजेच्या वेळेमुळे दोन सत्रातील श्येड्यूल आता विस्कळीत होणार आहे.-चंद्रकांत भंडारी, शिक्षण अभ्यासक.

खरं सांगू?...अतिशय उत्तम निर्णय आहे.बालवयातल्या मानसिकतेच्यादृष्टीने हा निर्णय स्तुत्य आहे. पालक सकाळी सहा वाजेपासून त्यांना झोपेतून उठविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही मुलं रडतात. इच्छा नसताना रिक्षात बसतात. त्यामुळे घरातील शांतताही बाधीत होते.-डॉ.प्रदीप जोशी, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :SchoolशाळाJalgaonजळगाव