शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जळगावात ११ जागांवर ‘महायुती’चे उमेदवार निवडून आणणार-गिरीश महाजन

By अमित महाबळ | Updated: June 23, 2024 21:02 IST

जळगाव : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आल्या. विधानसभेच्या ...

जळगाव : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आल्या. विधानसभेच्या निवडणुकीतदेखील सर्वच्या सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करू, असे आवाहन भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते रविवारी (दि.२३), पक्षाच्या लोकसभा समीक्षा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

समीक्षा बैठक ब्राह्मण सभेत आयोजित करण्यात आली होती. प्रदेश भाजपाने लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील चांगल्या गोष्टी आणि राहिलेल्या उणिवा यांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी प्रदेशकडून प्रदेश महामंत्री रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित बैठकीला उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा ह्या महायुतीच्या म्हणून निवडून येतील, असा शब्द वरिष्ठांना दिला आहे. लोकसभेला महायुतीच्या नेत्यांनी साथ दिली. भाजपाच्या सोबत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले. त्या धर्तीवर विधानसभेला मेहनत घ्यायची आहे, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती असताना जळगाव जिल्ह्यातून मात्र, दोन जागा निवडून आणल्याबद्दल रणधीर सावरकर यांनी कौतुक केले. राजेंद्र गावित यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कामगिरीची स्तुती केली.

घोळ नडला, नोंदणी वाढवा

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे यादीतून गायब होती. आता विधानसभेसाठी तयारी करा. ज्यांची नावे डिलिट झाली होती, त्यांचा समावेश करून घ्या. नवीन मतदार जोडा. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा