शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही

By सुनील पाटील | Updated: May 22, 2024 12:50 IST

पत्नी, दोन गोंडस मुलांसोबत संसार सुरू असताना त्यालाही दृष्ट लागली. क्षणातच पत्नी, मुलांना हिरावून घेतलं. लाडका भाचा सुट्ट्यांमध्ये आला. त्याचेही प्रेतच घरी गेलं... ही दुर्दैवी कहाणी आहे सरदार हिरालाल चव्हाण (वय २८, रा. लोंढ्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) या तरुणाची. 

सुनील पाटील -

जळगाव : अंगात श्रीमंती अन् मस्ती होती म्हणून ते गाड्यांची रेस खेळत होते, पण त्यांच्या या खेळात पत्नी, दोन मुलं व भाचा असे चार जीव गेले. खेळ परत खेळता येईल; पण गेलेले जीव परत येतील का? दहा वर्षांचा असताना आई, वडिलांचा मृत्यू झाला. मोठ्या भावाने सांभाळ करून माझं लग्न लावून दिलं. पत्नी, दोन गोंडस मुलांसोबत संसार सुरू असताना त्यालाही दृष्ट लागली. क्षणातच पत्नी, मुलांना हिरावून घेतलं. लाडका भाचा सुट्ट्यांमध्ये आला. त्याचेही प्रेतच घरी गेलं... ही दुर्दैवी कहाणी आहे सरदार हिरालाल चव्हाण (वय २८, रा. लोंढ्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता. जळगाव) या तरुणाची. 

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी भरधाव कारच्या धडकेत वच्छला सरदार चव्हाण (२७), मुलगा सोहम (८), सोमेश (२, सर्व रा. लोंढ्री, ता. जामनेर ह. मु. रामदेववाडी, ता.जळगाव) व भाचा लक्ष्मण नाईक (वय १७, जामनेर) हे चार जण ठार झाल्याची घटना घडली होती. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्येही अशाच प्रकारच्या एका घटनेची पुनरावृत्ती झाली.  या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. रामदेववाडी येथील घटनेला १५ दिवस उलटले तरी संशयित आरोपींना पोलिसांनी अजून अटक केलेली नाही. आठ दिवसांत आरोपींना अटक केली नाही तर थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. त्याचे नियोजन सुरू झाल्याचे चव्हाण म्हणाले.

जीवन जगण्याला अर्थच नाही-     दहा वर्षांचा असताना आई यशोदा हिचे निधन झाले. त्यापाठोपाठ वडिलांचा मृत्यू झाला. बालपणातच मातृपितृ छत्र हरपले. मोठा भाऊ अनिल चव्हाण याने बहीण कविता, ललिता आणि माझा सांभाळ केला. लग्नाच्या आधीच शिरसोली येथे आलो. -     डॉ.सोपान पाटील यांनी आधार दिला. त्यांच्याकडेच काम करू लागलो. २३ मे २०१६ रोजी वच्छला हिच्याशी लग्न झाले. संसार सुखाने बहरत गेला. सोहन आणि सोमेश ही दोन गोंडस मुले जन्माला आली. आता संसारात कसलीच कमी नव्हती. -     अशातच ७ मे २०२४ हा काळा दिवस उजाडला. पत्नी रामदेववाडी येथे आशा सेविकेची ड्युटी करून शिरसोली येथे जात असताना दुपारी ४:४५ वाजता श्रीमंतीची मस्ती असलेल्या बड्यांच्या मुलांनी माझं अख्खं कुटुंबच चिरडून टाकलं... या घटनेमुळे जगण्याचा अर्थ हरवला. एकही क्षण नाही की पत्नी, मुलं व भाचा डोळ्यांसमोर दिसत नाही.. हे सांगत असताना सरदारचे डोळे पाणावले होते. 

यात नेमके दोषी कोण? -     या घटनेत बेदरकारपणे वाहन चालवणारा मुलगा दोषी तर आहेच, पण मुख्य जबाबदार आहेत ते पालक, ज्यांनी वाहन देऊन मौजमस्ती करायला परवानगी दिली. बड्यांच्या मुलांना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी. -     पोलिस कोणावर अन् काय कारवाई करतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

पोलिस पाटलाचीही भूमिका संशयास्पदअपघात घडला तेव्हा पोलिस पाटील व काही नागरिक या प्रकरणातील आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत होते. आमच्यावर दु:खाचा प्रसंग असताना अशा परिस्थितीत पोलिस पाटलाकडून दगडफेक करण्यात आली. पोलिस पाटलाची भूमिका संशयास्पद असून, त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. आक्रोश मोर्चात आमची हीदेखील प्रमुख मागणी असणार आहे. आम्ही दु:खात असताना अनेक जण राजकारण करीत राहिले हे दुर्दैव असल्याची भावना या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

मग दारूचीही फॉरेन्सिक तपासणी करणार का? या घटनेत गांजा आढळूनही सुरुवातीला फिर्यादीत त्याचा उल्लेख केला नाही. नंतर कलम लावण्यात आले. तरीदेखील तो गांजाच आहे की अन्य कोणता पदार्थ यासाठी फॉरेन्सिक लॅबकडून त्याची तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. आमच्या घरात दारूच्या बाटल्या सापडल्या तर ही दारू आहे की पाणी, त्याचीही अशीच तपासणी करणार का? असा सवाल सरदारच्या नातेवाइकांनी केला.

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना प्रश्नअपघात प्रकरणात संशयित आरोपी निष्पन्न झाले का? आव्हाड : दोन संशयित आरोपी निष्पन्न झाले. ते उपचार घेत आहेत.पोलिस राजकीय दबावात संशयित आरोपींना वाचवत आहेत का? आव्हाड : अजिबात नाही. कायद्यात जे आहे, तेच आम्ही करीत आहोत. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.गाडीत दोघं जण होते तर मग चालक अज्ञात कसा व हे दोघे शेजारी कसे? आव्हाड : असं काही नाही. गाडीत असलेल्या दोघांनाच आरोपी केले.आरोपींना अटक का नाही होत? आव्हाड : दोन्ही संशयित आरोपी दवाखान्यात उपचार घेत आहेत. डिस्चार्जनंतर अटकेची कारवाई करू. आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.आव्हाड : हा अपघात आहे, खून नाही. कोणी राजकारण करत असेल तर त्यांच्यासाठी रुग्णालयातून उचलून आणून अटक नाही करू शकत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस