शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:42 AM

Jalgaon : चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ८० टक्के दुचाकींचा विमाच नाही

जळगाव : एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना दुचाकींचा विमा काढणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच आहे. बाईक खरेदी करताना विमा काढला जातो तो पहिला आणि अखेरचा असतो. नंतर मात्र विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही. आरटीओच्या म्हणण्यानुसार शंभरात फक्त २० जण दुचाकीचा विमा काढतात, ८० जण विमाच काढत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १ हजार ८४४ दुचाकी चोरी झालेल्या आहेत तर त्यापैकी फक्त ५४१ दुचाकींचा शोध लागलेला आहे. १ हजार ३०३ दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिसांकडून दुचाकी व चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरी झालेल्या १ हजार ८४४ पैकी फक्त २० टक्के दुचाकींचाच विमा होता, असेही निष्पन्न झालेले आहे.

दुचाकी चोरीवर्ष -   चोरीस गेल्या -  शोधण्यात यश२०२१ - ७५७         - २४८२०२० - ६२०          - १६८२०१९ - ४६७          - १२५

खरेदी करताना विमा पहिला अन् शेवटचाबहुतांश मालक दुचाकी खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वेळी विमा काढायचे नावच घेत नाही. सुरुवातीला कंपनीकडूनच पाच वर्षांचा विमा काढला जातो. नंतर पुढे मालकाला तो काढायचा असतो. अनेक मालकांनी खरेदी करतानाच जो विमा काढलेला असतो तोच शेवटचा असतो. नंतर विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही.

किंमत पण कमी नायदुचाकीच्या किमती आधी कमी होत्या. आता कुठलीही दुचाकी ५० ते ६० हजारांपासून सुरू होते. त्यामुळे ती चोरीस गेल्यास मोठा फटका बसतो. काही दुचाकींच्या किमती तर एक ते पाच लाखांपर्यंत आहेत. या महागड्या दुचाकीच चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघात असो किंवा चोरी अशावेळी विम्यामुळे मोठा दिलासा मिळतो.

दुचाकी चोरी गेल्यानंतर डोळे उघडतेवाहन कोणतेही असो त्याचा विमा काढणे कायद्याने सक्ती तर आहेच पण वैयक्तिक देखील फायदेशीरच आहे. दुचाकी चोरी गेली की तेव्हा त्याचे महत्त्व कळते. विमा काढलेला असला तर दुचाकी चोरी झाली तरी त्याची रक्कम मालकाला विमा कंपनीकडून मिळते.-किशोर पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याचे महत्त्व अजूनही लोकांना कळलेले नाही. सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे, चोरी गेलेले वाहन सापडलेच याची शाश्वती नाही. त्यामुळे विमा काढून दुचाकीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. चोरी गेली तर कंपनीकडून मोबदला मिळतो.- शिवाजी पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याबाबत दुचाकीस्वार काय म्हणतात?नियमित कामाच्या व्यापात दुचाकीच्या विम्याची मुदत कधी संपते, ते कळतही नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. पेट्रोलचे वाढते दर, मजुरी कमी व घरखर्च याचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होते, म्हणून विमा काढायला टाळाटाळ होते.-पुंडलिक संतोष पाटील, दुचाकीस्वार

इच्छा असूनही विमा काढला जात नाही. विम्याला एका वर्षासाठी दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. दहा वर्षांत तर जुन्या दुचाकीच्या किमतीइतकीच रक्कम विम्याची होती. विमा काढणे फायदेशीरच आहे.-मुकेश गंगाधर शिंदे, दुचाकीस्वार

शंभरात २० दुचाकींचाच विमादुचाकीचा विमा काढणाऱ्यांची संख्या फक्त २० टक्के इतकीच असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. नवीन दुचाकी घेताना सुरुवातीला पाच वर्षांचा विमा असतो, नंतर मात्र विमा काढण्याकडे मालकाकडून दुर्लक्ष होते. विमा नसला तरी दुचाकी हस्तांतर केली जात नाही.

टॅग्स :bikeबाईकJalgaonजळगाव