शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

जळगावात वाढते तापमान, इसमाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:52 PM

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच सांगता येत नाही मात्र टेंभुर्णे यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, असे वैद्यकीय ...

ठळक मुद्देउष्णतेची लहरटेंभुर्णे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २९ - पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न समारंभाहून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी कंझरवाडा परिसरात घडली. दरम्यान, उष्माघात आहे की काय हे आताच सांगता येत नाही मात्र टेंभुर्णे यांच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी सांगितले.शहरातील जलाराम नगर येथील रहिवासी गजानन केशव टेंभुर्णे हे सकाळी दुचाकीने जळगाव येथून पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी जळगावकडे येत असताना अचानकपणे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कंजरवाडा समोरील वखारीजवळ थांबले. त्याचठिकाणी ते खाली कोसळून त्यांना उलटी झाली व ते बेशुद्ध पडले. त्या वेळी परिसरातील दोन युवकांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्याच या बाबत माहिती दिली. काही वेळातच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे त्याठिकाणी पोहचल्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झवर हेदेखील त्याठिकाणी पोहचले व मदत कार्य करीत टेंभुर्णे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. धीरज महाजन यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मयत घोषीत केले.जिल्हा रुग्णालयात आक्रोशजिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गजानन टेंभुर्णे यांना मयत घोषीत करताच त्यांची पत्नी कल्पना टेंभुर्णे यांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.उष्णतेची लहरतापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लहर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव