शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

जळगाव जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पेरण्या वाया जाण्याची भीती

By admin | Published: June 28, 2017 12:34 PM

पेरण्या 50 टक्क्यांवर जाऊन थांबल्या. सव्वालाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस सुस्थितीत; बियाण्यांची पुन्हा मागणी

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.28 - जिल्हाभरात 50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पण पावसाने ओढ दिल्याने तब्बल दोन लाख हेक्टरवरील पेरण्या  वाया जाण्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी व्यवस्थितपणे न अंकुरलेल्या पेरण्या मोडायला सुरुवात झाली आहे. यातच पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्याही थांबल्या आहेत. 
जिल्हाभरात सात लाख 67 हजार हेक्टरवर पेरण्यांचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठरविले होते. जूनच्या सुरुवातीला पेरण्या झाल्या. चोपडा, धरणगाव, जळगावमधील तापीकाठ व गिरणा काठावरील गावांमध्ये धूळ पेरण्याही केल्या. पण पाऊस व्यवस्थितपणे न आल्याने पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. 
सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीन 40 किंवा यापेक्षा अधिक मि.मी. पावसात अंकुरतो, पण अपु:या पावसात सोयाबीन अंकुरलाच नाही. जवळपास 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन मोडण्याची वेळ आल्याची माहिती आहे. यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग या पिकांची पेरणी वाया गेली आहे. 
एक लाख हेक्टरवरील कोरडवाहू कापूसही कोमेजला
जवळपास एक लाख हेक्टरवरील कापसालाही कमी पावसाचा फटका बसला आहे. 11 जूननंतर अनेक शेतक:यांनी कोरडवाहू क्षेत्रातही कापसाची लागवड केली होती. पण हा कापूस न अंकुरल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतक:यांना सहन करावे लागले आहे. 
कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदींच्या दोन लाख हेक्टरवरील पेरणीला फटका बसला आहे. तर जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिके सुरक्षित आहेत. अर्थातच जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पाऊसमान नाही. पण पाचोरा, एरंडोलचा पारोळानजीकचा भाग, पारोळा, अमळनेरचा दक्षिणेकडील अर्धा भाग, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये स्थिती बरी आहे. अधून मधून आलेल्या हलक्या पावसाने या भागातील पिकांना जीवदान दिले. 
बियाण्याची मोठी उचल सध्या बाजारपेठेत सुरू आहे. पाऊसमान काही भागात बरे आहे. पण काही भागात पाऊसच नाही.  कापूस, उडीद, मूग, सोयाबीन या बियाण्यांची दुबार पेरणीसाठी मागणी वाढल्याने जि.प.च्या कृषी विभागाने अधिकचे बियाणे कृषी आयुक्तालयाकडे मागितले आहे. कापसाचे बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याची कुठलीही टंचाई किंवा अडचण नसल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.