शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Jalgaon: महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात नेत्यांमधील खदखद बाहेर  

By अमित महाबळ | Updated: January 14, 2024 19:54 IST

Jalgaon Politics News: २००१ पासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. इतकी वर्षे शिवसेना व भाजपा युती होती पण एकाही शिवसैनिकाने भाजपाशी गद्दारी केली नाही. मात्र, भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला.

- अमित महाबळजळगाव - २००१ पासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. इतकी वर्षे शिवसेना व भाजपा युती होती पण एकाही शिवसैनिकाने भाजपाशी गद्दारी केली नाही. मात्र, भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला. त्याला पक्षाकडून बक्षीस मिळाले, अशी खंत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी रविवारी, महायुतीच्या पहिल्याच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.

जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावरील एका लॉनवर हा मेळावा झाला. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जावा म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील म्हणाले, की फडणवीस, शिंदे व अजित पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येही समन्वय असायला हवा. नेत्यांना बोलावूनही ते बाजार समितीच्या मेळाव्याला आले नाहीत. आमचे काही चुकत असेल तर आम्हाला पायातल्या जोड्याने हाणा पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे चुकीचे आहे. ‘मी आता जे काही बोललो ते मला माहीत नाही.’ पण तिळगूळ घ्या, गोडगोड बोला... लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुती म्हणून बहुमत मिळवूया, असेही आमदार किशोर पाटील शेवटी म्हणाले.

खालीही समन्वय हवा...शिवसेना, भाजपा युती म्हणून लढलो. निवडणुकीनंतर विरोधात उभे राहिलो. लढलो सोबत पण सत्ता स्थापन केली विरोधकांसोबत. आज पुन्हा सोबत आलो आहोत. आम्ही जे केले ते ती गद्दारी नाही, तर उठाव होता. वर नेत्यांमध्ये समन्वय असेल तर खालीही तो हवा, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.

टॅग्स :Kishor Patilकिशोर पाटीलJalgaonजळगाव