शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

जामनेर आगाराला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 4:17 PM

जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम८७ बसेस जागेवरच

(सय्यद लियाकत /मोहन सारस्वत)जामनेर, जि.जळगाव : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी सुरू आहे. परिणामी २२ मार्चपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातील तब्बल ८७ बसेसची चाके जागेवरच थांबली आहेत. यातून जामनेर आगाराला चार कोटींचा फटका बसणार आहे. प्रति दिवस सरासरी आठ लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती आगारप्रमुख कमलेश धनराळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई, पुणे बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतात. त्यासाठी जवळपास ४४० कर्मचारी कार्यरत आहेत. जामनेर आगार विभागाची दैनदिन आर्थिक उलाढाल आठ ते नऊ लाखांच्या घरात आहे. मार्च महिन्यात केवळ २२ दिवस एस.टी. बसने प्रवाशांना सेवा दिली. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंंतर मात्र आगाराच्या ८७ बसेस जागेवरच थांबून आहेत. देशभर लॉकडाऊन सुरू असल्याने सेवाही ठप्प झाली आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जवळपास ४५ ते ५० दिवस एस.टी. बसेसची चाके थांबणार आहेत. यातून दिवसाला आठ लाख रुपये या हिशोबाने तब्बल चार कोटी रुपयांवर जामनेर आगाराला पाणी सोडावे लागणार आहे. तसेच एप्रिल २०१९ मध्ये जामनेर आगाराला दोन कोटी ९६ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते व जिल्ह्यात जामनेर आगार उत्पन्नात एक नंबर आले होते. मात्र यावेळी लॉकडाउनचा मोठ्या प्रमाणावर फटका जामनेर आगाराला बसला आहे.७२ वर्षात पहिल्यांदाच थांबली बसेसची चाकेमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला जवळपास ७२ वर्षांचा कालावधी होत आहे. यामध्ये पहिल्यांदाच कोरोनामुळे बसेसची चाके थांबली आहेत. आंदोलन, संप यामुळे काही दिवस बससेवा विस्कळीत व्हायची. मात्र लॉकडाऊनने या सेवेला सध्या ब्रेक लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर