शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

अपघातग्रस्तांची सेवा केली कपिलनगरवासीयांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:13 AM

दीपनगर, ता. भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील कपिलनगर वस्तीजवळ २ जुलैच्या मध्यरात्री १२:३० सुमारास लक्झरी व ...

दीपनगर, ता. भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील कपिलनगर वस्तीजवळ २ जुलैच्या मध्यरात्री १२:३० सुमारास लक्झरी व कंटेनर या दोघांमध्ये भीषण अपघात होऊन, यामध्ये एका प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता व अन्य नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. यातील जखमी व इतर प्रवाशांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था कपिलनगर वस्तीतील नागरिकांनी केली.

अपघातातील कंटेनर चालक कुलदीपसिंग याला अद्यापही ताब्यात घेतले नसून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे तपास हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील यांनी सांगितले.

या घटनेमध्ये दोघा वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त वाहने व कपिलनगर परिसरातील एक घर यातील अंतर फक्त पाच फूट इतकेच राहिले होते. या घटनेची माहिती परिसरात कळताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या सर्व प्रवाशांना उचलून त्यांना मलमपट्टी केली व त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चातून करून दिली.

या कोरोना काळात माणूस माणसाला स्पर्श करतानाही मरणाची भीती बाळगतो, परंतु यास कपिलनगरमधील सर्व नागरिक अपवाद ठरले आहेत. त्यांनी अपघातात जखमी प्रवाशांची देखभाल करून ३ रोजी सायंकाळी चार वाजता लक्झरी गाडी उपलब्ध करून प्रवाशांना सुखरूप निरोप दिला.

याप्रसंगी अतिशय कृतज्ञतापूर्वक व भावनापूर्वक सर्व प्रवाशांनी कपिलनगरमधील नागरिकांचे आभार मानले.

मागील काही महिन्यांपूर्वी याच घटनास्थळी वंचित बहुजन आघाडी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व कपिलनगरवासीयांनी कपिलनगरातील नागरिकांना रहदारीसाठी उपरस्ता किंवा बोगदा करून मिळावा, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन, चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते. योगायोग याच ठिकाणी हा मोठा भीषण अपघात झाला आहे. तरी प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व लवकर पर्याय रस्त्याचा मार्ग करून मिळावा, अशी परिसरातील नागरिकांमधून मागणी होत आहे.