शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

अयोध्येतील जमीन व्यवहार संपूर्ण पारदर्शक, आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर राधे-राधे बाबा (इंदूर) यांनी अयोध्येतील जमीन व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक असल्याचे स्पष्टीकरण केले. या व्यवहारात कुठलाही भ्रष्टाचार, घोटाळा नसून हे आरोप म्हणजे राजकीय षड‌‌यंत्र असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर गोवंश हत्येसंदर्भात कडक कायदे करावे, अशी मागणीही केली.

येथील सतपंथ संस्थांच्या आश्रमात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत मागील भूमिका विशद केली. त्यांनी प्रास्ताविकात श्री राम मंदिर निर्माण यासाठी अनेकांनी श्रद्धेने दान दिले आहे. मात्र आज देणगी न देणारे हिशेब मागत आहे, ही शोकांतिका आहे. राधेराधे बाबा यांनी श्रीराम मंदिर निर्माणचे कार्य व्यवस्थित व नियोजनानुसार सुरू आहे. जमिनीचा व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक आहे. १० वर्षांपूर्वी झालेला हा व्यवहार असून आज मंदिर निर्माणानंतर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा यासाठी जी जमीन खरेदी होत आहे शासकीय नियमानुसार हा व्यवहार होत आहे. जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचे कार्य काही मंडळी करीत आहे. त्यांचा निषेध व्यक्त करीत संत समिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सोबत असल्याचे आवर्जुन सांगितले.

यावेळी त्यांनी श्री राम मंदिर ट्रस्टमध्ये संत समितीचे तीन प्रमुख प्रतिनिधी सदस्य असल्याचेही उल्लेख केला. पत्रकार परिषदेला महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, सावदा येथील सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामिनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास, जामनेरच्या गुरुदेव सेवा आश्रमचे श्यामचैतन्य महाराज, स्वामी प्रभुदास महाराज यांची उपस्थिती होती.

गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

या पत्रकार परिषदेत श्री राधे राधे बाबा यांनी गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच 'गो' अभयारण्य निर्माण करावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठ्या निष्ठेने घेतले जाते. त्यांचे पुत्र आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गोवंश हत्या, कत्तलखाने बंद करण्यासाठी कडक पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.