शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?

By अमित महाबळ | Published: September 05, 2022 4:47 PM

वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

जळगाव : काँग्रेसच्या जिल्हा प्रभारीपदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नियुक्तीनंतर संघटनेत मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकांत भाकरी फिरविण्याच्या इरादा ठेवूनच पक्षाने देशमुख यांच्याकडे जळगावचा पदभार सोपविला असल्याचे कळते.

विनायक देशमुख ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून, त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे. पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन त्यांच्याकडे आहे.

बजावली होती मोठी भूमिका२०१६ ते २०१९ या कालावधीत देशमुख यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. याच काळात विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभेला आ. शिरीष चौधरी निवडून आले. त्यांच्यामागे संघटनात्मक ताकद उभी करण्यात देशमुखांची आघाडी होती. मुक्ताईनगरमध्येही ते पक्षाच्या आदेशानुसार सक्रीय होते. नंतरचा इतिहास सगळ्यांनाच ठावूक आहे.

जागा खेचून आणली२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील नेते रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यायला इच्छूक नव्हते. विनायक देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करून ही जागा पक्षाकडे खेचून आणली होती. देशमुख यांचा जळगाव जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. आता त्यांची पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या आशेने पाहणारे अनेक जण आहेत.

धाडसी निर्णय घ्यावे लागणारपक्षात संघटनात्मक पातळीवर मतभेद आहेत. वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय चुकल्याने गेल्या काही दिवसांत काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा बँकेत आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना संघटनेसाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत.

ही होती चमकदार कामगिरीदेशमुख यांच्याकडे चार वर्षे जळगाव जिल्हा होता. त्यानंतर एक वर्ष त्यांनी धुळ्यात काम केले. २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे सिंधुदुर्ग सोपवले. देशमुखांचा गृह जिल्हा अहमदनगर आहे. तेथून सिंधुदुर्गला जायचे झाल्यास १२ ते १४ तास लागतात. हे अंतर पार करून त्यांनी कुडाळची नगरपंचायत प्रथमच पक्षाला मिळवून दिली. त्यांची याआधीची कामगिरी पाहिल्यास जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याची कामगिरी विनायक देशमुख पार पाडतील का हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव