शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:16 AM

जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ ...

जळगाव : जनता कर्फ्यूमुळे जळगावातील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून यामध्ये सुवर्णनगरी अशी ख्याती असलेल्या येथील सुवर्ण व्यवसायालाही झळ बसली असून दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनचे लॉकडाऊन, त्यानंतर शिथिलता मिळाली तरी संसर्ग वाढत असल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी बंद ठेवलेला व्यवसाय, जुलै महिन्यातील सात दिवसांचे लॉकडाऊन या नंतर आता पुन्हा जनता कर्फ्यूमुळे व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने पुन्हा संकट ओढावले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. येथील सुवर्ण व्यवसाय मोठा असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते. मात्र वाढत्या कोरोनाने या व्यवसायाला पुन्हा फटका बसला आहे. जळगावात सुमारे २२५ ते २५० सराफ व्यावसायिक आहेत. जळगावात दररोज ५० ते ६० कोटी रुपयांची उलाढाल होते. जनता कर्फ्युमुळे दोन दिवसात १०० ते १२५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून रविवारीदेखील जनता कर्फ्यू राहणार असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे.