शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून आता तीन जिल्ह्यात मिशन ‘एनईपी’ 

By अमित महाबळ | Updated: January 3, 2024 19:31 IST

६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे

अमित महाबळ, जळगाव: पदवीस्तरावर येत्या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. ९ व १० जानेवारी २०२४ रोजी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ६२ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात विद्यापीठाशी संलग्न प्राचार्य, प्राधिकरणाचे सदस्य, संस्थाचालक यांच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याचवेळी विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत या धोरणाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळा घेण्यात येतील, असे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी जाहीर केले होते. जळगाव जिल्ह्यातील ३४, धुळे जिल्ह्यातील १९ आणि नंदुरबार जिल्ह्यातील ९ महाविद्यालयात दि.९ व १० जानेवारी रोजी दोन सत्रांमध्ये या कार्यशाळा होणार आहेत. ज्या महाविद्यालयात या कार्यशाळा होणार आहेत. त्या महाविद्यालयाच्या परिसरातील इतर महाविद्यालयांना देखील आयोजक महाविद्यालयांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने या कार्यशाळा होत असल्याची माहिती कक्षाचे संचालक प्रा. समीर नारखेडे यांनी दिली.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांची बैठक बुधवार दि. ३ जानेवारी रोजी विद्यापीठात घेण्यात आली. या बैठकीत कुलगुरूंनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. जगदीश पाटील हे उपस्थित होते.

कार्यशाळा महत्त्वाची कारण...

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाने २१ तज्ज्ञांची टीम तयार केली असून, आयोजक महाविद्यालयांमध्ये जावून हे तज्ज्ञ पदवी स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण कशा पद्धतीने लागू होणार आहे, ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रम कसा असणार आहे यामधील मेजर आणि मायनर विषय म्हणजे काय आदी बाबत सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन करणार आहेत. एका कार्यशाळेत १५० ते २० विद्यार्थी अपेक्षित आहेत. जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत दोन दिवसात हे धोरण पोहचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

कार्यशाळेला कोण अपेक्षित...

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील १२ वी प्रवेशित विद्यार्थी, पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना या कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी