शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

जळगाव जिल्ह्यात १००हून अधिक लोकप्रतिनिधींना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:05 PM

जात वैधता प्रमाणपत्र

जळगाव : राखीव जागांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेले मात्र त्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील १००हून अधिक नगरसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांना फटका बसू शकतो. यात ग्रामपंचायत सदस्यांची जास्त संख्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.महाराष्ट्र ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद व महापालिका कायद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राखीव जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र असे प्रमाणपत्र मिळाले नसेल तर ते निवडून आल्यानंतर सहा महिन्यात देण्याची मुभा आहे. ते न दिल्यास त्याचे पद निवडून आल्याच्या पूर्वलक्षी प्रभावाने आपोआप रद्द झाल्याचे मानण्यात येईल व त्यासाठी प्राधिकाºयाने स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही, अशी तरतूद कायद्यात आहे.या बाबत दोन खंडपीठांनी परस्परविरोधी निकाल दिल्याने हे मुद्दे पूर्णपीठाकडे सोपविले गेले होते. त्यानंतरही २९ विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या. त्यावर नुकताच निकाल देण्यात आला. त्यानुसार प्रमाणपत्र सादर न करणाºयांना या तरतुदी लागू होतात.त्यानुसार जळगाव जिल्ह्यात १००हून अधिक नगरसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांना फटका बसू शकतो. यात जास्त संख्या ग्रामपंचायत सदस्यांचीच असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी अभिजित भांडे- पाटील यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव