शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

‘जंक्शन’ ची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:20 AM

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे ...

रेल्वेच्या माध्यमातून अवघ्या देशाला जोडणारे शहर म्हणून भुसावळ जंक्शनची ओळख आहे. देशातील बहुतांश सर्वच भागातून गाड्या येथे येत असल्यामुळे विविध भागातून, राज्यातून नागरिक येथे येतात व काही काळ थांबल्यानंतर पुढील प्रवासास येथून रवाना होतात. त्यामुळे प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी असते. तर काही परदेशी पर्यटकही येथे येऊन अजिंठा व अन्य पर्यंटनाच्या ठिकाणी रवाना होत असतात.

दहशत संपली, पण...

रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाच्या या शहरात गेल्या वर्षी पहिल्या लाटेत व आता दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. देान लाटेत मिळून येथे आजअखेर १३ हजार २०१ बाधित येथे आढळून आले आहेत. तर ३३५ जणांचा कोेरोनाने बळी घेतला आहे. या लाटेत तर एक वेळ अशी होती, की स्मशानभूमीत मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाइकांना शव घेऊन काही तास प्रतीक्षा करावी लागत होती. ही स्थिती भुसावळकरांनी अनुभवली आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एक दिलासादायक चित्र तालुक्यात आहे.

----

पाच दिवसातील बाधित व सक्रिय रुग्ण

३० जून --- ० --- ४७

१ जुलै --- ४----४८

२ जुलै ---१----४६

३ जुलै ---१----४२

४ जुलै ---०---३९

-----

आतापर्यंतचे लसीकरण

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे; मात्र लसीकरणावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ४३ हजार ६९१ एवढी आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १६ हजार ४४५ एवढी आहे. आतापर्यंत एकूण ६० हजार १३६ बाधितांनी लस घेतली आहे. लसीकरण वाढवावे व त्यासाठी केंद्रांची संख्याही वाढवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

-----

नियम पाळले जावेत

कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असली तरी शासनाने ठरवून दिलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकाेर करणे गरजेचे आहे. यात नागरिकांचाही जास्तीत जास्त सहभाग असणे गरजेेचे आहे. व्यापारी पेठा शनिवार व रविवार बंद असतात; मात्र अन्य दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. याचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे, तसेच मास्क लावणे, सॅनिटाईझरचा वापर याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे असून, यावर पालिका तसेच पोलीस प्रशासनाने काटेकोर पालन करायला लावणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही मास्क न लावता फिरताना दिसतात. त्यावर गांभीर्याने लक्ष दिले जाणे आवश्यक आहे.