शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

कोरोना ‘लॅब’च्या विश्वासार्हतेवरच खासदारांनी उपस्थित केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:21 PM

निगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना होतोय पुन्हा त्रास

जळगाव : कोरोनाच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेकडून (लॅब) ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्या रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा दावा खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. या प्रयोगशाळेत योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही या विषयी आपण तज्ज्ञांकडून माहिती घेणारआहोत आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे (आयसीएमआर) लॅबविषयी तक्रारही करणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जळगावात घेण्यात आलेले नमुने (स्वॅब) पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यानंतर धुळे येथे लॅब सुरू झाली व तेथे हे नमुने पाठविण्यात येऊ लागले. मात्र रुग्णसंख्या वाढतच असल्याने जळगावात लॅब सुरू करण्याची मागणी होऊ लागली व त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लॅब सुरू करण्यात आली.जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता खासदार उन्मेष पाटील यांनी या प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली आहे. या प्रयोगशाळेतील अहवालाबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असून ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना पुन्हा त्रास होत असल्याचे खासदार पाटील म्हणाले. यात उदाहरण म्हणून त्यांनी जामनेर व पारोळा येथील रुग्णांच्या अहवालाचा संदर्भ दिला.अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना घरी सोडण्यात आले व पुन्हा त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे खासदार म्हणाले. अहवाल व्यवस्थित आले तर रुग्णांवर उपचारही करता आले असते. मात्र जर प्रयोगशाळेचे अहवालच संशयास्पद येत असतील तर रुग्णांवर उपचार तरी कसे होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेची सर्व माहिती आपण मागविली असल्याचे खासदार म्हणाले. लॅबला मान्यता दिली असली तर तेथे योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही, याची तज्ज्ञांच्या मदतीने खात्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव