शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाखांचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:58 PM

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाख रुपये प्रवाशाना परत करण्यात आले.

ठळक मुद्देरेल्वे प्रवासासाठी आता दोन्हीकडील पत्ते आवश्यकप्रवाशाने लढवली अशीही शक्कल

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊन काळात प्रवासासाठी तिकीट खिडकीवरून बुक करण्यात आलेले तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. भुसावळ येथे दोन तिकीट खिडक्यावरून ८ ते १० जून या तीन दिवसात ७४० प्रवाशांनी तिकीट रद्द केले. यातून ९ लाखाचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला, तर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी स्थानिक व ज्या ठिकाणी प्रवास करणार आहे त्या व्यक्तीचा पत्ता आरक्षण फॉर्मवर टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे.लॉकडाऊन उघडल्यानंतर रेल्वेत प्रवास करता येईल या आशेपोटी अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे तिकिट आरक्षित केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रेल्वेतून प्रवास करता येणार नाही, असे नियम टाकल्यामुळे तसेच इतर राज्यांमध्येही स्थानिक नियम असल्यामुळे अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी ८ जूनपासून तिकीट खिडकी उघडल्यानंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षित अंतराचे पालन करून तिकीट रद्द केले. ८ जूनला पहिल्याच दिवशी ३७० तिकीटातून एक हजार प्रवाशांनी तिकीट रद्द केले. ९ रोजी २०० तिकीटातून ५०० प्रवाशांनी यात्रा रद्द केली, तर १० जून रोजी १७० तिकीटवरून ४९० प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट रद्द केले.८ ते १० जून दरम्यान ६४०तिकीटतून दोन हजार प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन रद्द केले. यातून आठ लाख ९० हजाराचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला.भुसावळ रेल्वे आरक्षण कार्यालयात चारपैकी १ व ३ क्रमांकाच्या तिकीट खिडक्या सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघड्या आहेत. ज्या प्रवाशांनी १ ते १५ मे दरम्यान तिकीट बुक केले होते, त्यांना १४ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करता येतील. १५ ते ३१ मे दरम्यान केलेले तिकीट बुक रद्द करण्यासाठी २१ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तर १ जून ते ३० जूनपर्यंत तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना २८ जूनच्या पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट रद्द करता येतील. प्रवाशांनी तिकीट खिडकीवर गर्दी करू नये. प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम अदा करण्यात येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.प्रवाशांनी लढवली शक्कल भुसावळपर्यंत प्रवासासाठी बुऱ्हाणपूर तिकीटमहाराष्ट्रमध्ये दिवसेंदिवस वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता राज्यामध्ये कोणीही प्रवासी जिल्हाअंतर्गत रेल्वेने प्रवास करू शकत नाही. मात्र इतर राज्यांमध्ये प्रवास करू शकतो. या नियमात भुसावळ, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यातील प्रवास्यानी शक्कल लढवत पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून भुसावळ ,जळगाव बुलढाणाकडे येण्यासाठी भुसावळ राज्यांतर्गत असल्यामुळे नियमानुसार तिकीट मिळत नाही. यामुळे जवळपास असलेल्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर शहराचे तिकीट काढून बराहणपुरला आल्यानंतर खासगी वाहनाने आपल्या गावी परत येत आहे, अशाप्रकारे प्रवाशांनी शासनाच्या नियमावर मध्यप्रदेश या ठिकाणी महाराष्ट्राच्या ठिकाणी मध्यप्रदेश बऱ्हाणपूर उतरण्याची शक्कल लढवली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ