शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

तिशी ओलांडली; पगार कमी, नवऱ्याला नवरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 1:09 PM

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे.

- अमित महाबळ

जळगाव : मुलामुलींची वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी विवाह जुळणे ही आता एक मोठी समस्या बनली आहे. दोघांच्याही असलेल्या अवास्तव अपेक्षा, तडजोडीस तयार नसणे, पालकांची मानसिकता यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.

काळ बदलत गेला, मुलामुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. त्यांच्या हातात लाखांच्या पॅकेजमध्ये पैसा येऊ लागला पण, एवढे असूनही विवाह न जुळणे ही एक समस्या बनली आहे. दोनही बाजूने ठेवण्यात येणाऱ्या काही अटी यामध्ये अडथळा ठरत आहेत. शेतकरी मुलांना मुलगी मिळेनाशी झाली आहे. मुलगा उच्चशिक्षित असल्यास त्याला ग्रामीण भागातील, आपल्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी नको असते. मुलाचा स्वत:चा फ्लॅट मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरात असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. विवाह न जमण्यात कमी पगार ही मुख्य अडचण आहे. परदेशी जाण्यास मुली आता तयार नसतात. हा एक बदल झाला आहे. मात्र, परदेशात नोकरीला असलेल्या मुलांनी काय करावे ? या प्रश्नाचे उत्तर किचकट झाले आहे. घरात सासू-सासरे नकोत ही अट काटेरी ठरत आहे.

म्हणून वाढतेय विवाहाचे वयमुलगा आणि मुलगी या दोघांच्याही काही अपेक्षा अशा असतात की, त्यामुळे त्यांचे विवाहाचे वय वाढत चालले आहे. शिक्षण, मालमत्ता, मोठ्या शहरांसाठी आग्रह, कुटुंबांतील सदस्यांची संख्या किंवा घरात सासू-सासरे नकोत आदी मुद्दे यामध्ये आहेत.

वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टरवकील, डॉक्टर असलेल्या मुला-मुलींना आपला जोडीदार समव्यावसायिक असावा, अशी अपेक्षा असते. तशी अटच त्यांच्या परिचय पत्रात टाकली जाते. अभियांत्रिकी, संशोधन क्षेत्रात शिक्षण झालेल्यांची अपेक्षा उच्चशिक्षित जोडीदार मिळावा, अशी असते.

५० टक्के तरुण तिशीपारविवाहविषयक समस्येचा धांडोळा घेताना ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण ५० टक्के तरूण तिशीपार आढळले. मुलगा असल्यास वय वर्ष २८ तर, मुलीसाठी वय वर्ष २० ते २२ नंतर पालक स्थळ पाहण्यास सुरुवात करतात.

१० टक्के चाळिशीपारयोग्य वयात विवाह न होणे ही एक मोठीच समस्या बनली आहे. वयाची तिशी उलटून जाणे ही बाब सामान्य बनली आहे. ‘लोकमत’ने शहरातील तीन वधू-वर सूचक मंडळाची आकडेवारी पाहिली. यात साधारण १० टक्के तरूण चाळिशीपार आढळले.

अपेक्षा वाढल्या....मुला-मुलींच्या अपेक्षा खूप असतात. त्यामुळेही योग्य वयात त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा लवकर मिळत नाही. आधीच्या तुलनेत अपेक्षा खूप वाढल्या आहेत.- अजय डोहोळे

मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांचे विवाहाचे वय वाढते. त्यांना मुलगी मिळत नाही. सरकारी नोकऱ्या कमी संख्येने उपलब्ध असल्या तरी त्यासाठीचा मुलींचा आग्रह कायम आहे.- लक्ष्मीकांत चौधरी

भरपूर उत्पन्न, उच्च शिक्षणाच्या अवास्तव अपेक्षा यामुळे मुला-मुलींचे विवाह जमण्यात अडथळे येतात. ज्याच्याकडे शेती कमी आहे आणि जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, अशा मुलांसमोरील समस्या मोठी आहे.- सुमित पाटील

टॅग्स :Jalgaonजळगावmarriageलग्न