शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

फिजिक्स आणि केमिस्ट्रीने विद्यार्थ्यांना फोडला घाम! एकाच नावाने उडाला गोंधळ

By सुनील पाटील | Updated: May 7, 2023 21:19 IST

परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.

जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यात १३ केंद्रांवर पार पडली. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांनी विद्यार्थ्यांना प्रचंड घाम फोडला. दर आठवड्याला घेण्यात येत असलेल्या टेस्टपेक्षाही कठीण प्रश्न या परीक्षेत होते, त्यामुळे निम्मेही प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांना कठीण गेले. परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.

या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. प्रत्यक्षात २ हजार ८५२ विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी विविध कारणांनी परीक्षा देऊ शकले नाही. ही परीक्षा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये जळगाव शहरातील दोन केंद्रांचा समावेश होता.तालुका पातळीवर काही केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा पार पडली. या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर एकूण ७२० प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजीचे ३६० तर फिजिक्स व केमिस्ट्री या विषयावर आधारित प्रत्येकी १८० प्रश्न होते. या प्रश्नांची सोडवणूक करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली.

अनेक विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक आहे. यंदाच्या परीक्षेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नांनी घाम फोडला. तुलनेत बायोलॉजीचे प्रश्न तितके अवघड नव्हते, असे काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती नीट परीक्षा जिल्हा समन्वयक प्रा.अब्राहम मॅथ्यू यांनी दिली.

एकाच नावाचे शाळांमुळे गोंधळपोद्दार इंटरनॅशनल हे परिक्षेचे केंद्र होते. या नावाने जळगाव चाळीसगाव येथे शाळा आहेत. परिक्षा मात्र चाळीसगाव केंद्रावर होती.त्यामुळे काही विद्यार्थी जळगावच्या शाळेत आले होते. हे केंद्र नसल्याचे कळाल्यावर ते चाळीसगाव रवाना झाले. हा किरकोळ गोंधळ वगळता परिक्षा कुठेही वाद झाला नाही. शांततेत परीक्षा पार पडली. 

टॅग्स :examपरीक्षा