शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

दुष्काळाचे वर्षानुवर्षे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:07 AM

चंद्रशेखर जोशी जळगाव : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे चिन्हे ...

चंद्रशेखर जोशीजळगाव : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे चिन्हे प्रारंभीच्या कालखंडात होते. पाऊसही वेळेवर सुरू झाला. त्यामुळे कृषि जगतात समाधानाचे वातावरण होते. मात्र पावसाळ्याच्या दुसºया टप्प्यात पावसाने जी दडी मारली ती शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळविणारी ठरली. पावसाळ्याच्या अखेर जेमतेम ७० ते ७४ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. याचे परिणाम पिकांवर मोठ्या प्रमाणात झालेले दिसून येत आहेत. खरीप हंगाम जेमतेम ५० टक्के हाती लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण आता दिसू लागले आहे. पुढील वर्षाची सुरूवात ही भीषण टंचाई घेऊन येणारी ठरेल असेच दृश्य आतापासून दिसते आहे. या परिस्थितीची शासकीय यंत्रणांनी अवलोकन केले असता १५ पैकी १२ तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल असे भाकित वर्तविले जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी आता विविध पातळ्यांवर मागणी सुरू झाली आहे. शासनाच्या निकषांनुसार १२ तालुक्यातच दुष्काळ असल्याचे समोर येत आहे. धरणगाव व एरंडोल तालुक्यात ही स्थिती नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर येत आहे. असे असले तरी या मागे राजकारण असल्याचा आरोप केला जात आहे. यापेक्षा भयंकर स्थिती म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचे दौरे जिल्ह्यात होऊ लागले आहेत. पहिल्यांदा कॉँग्रेसचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे जिल्ह्यात येऊन गेले. त्यानंतर राष्टÑवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या जिल्हा दौºयावर येऊन गेल्या. या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन विद्यमान सरकार दुष्काळी स्थितीबाबत कसे दुर्लक्ष करत आहे याची टीका या नेत्यांनी केली. यावेळी पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न केला. तो म्हणजे गेले अनेक वर्षे आपले सरकार सत्तेत होेते. त्या काळाही नैसर्गिक आपत्ती ही आली. मात्र त्यावरून धडा घेऊन आपण तेव्हा उपाय योजना काय केल्या ? उपाय केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली असती का? यावर सुप्रिया सुळे यांनीही कबुली दिली की, खरोखर उपाय योजना या पूर्वीपासून फारशा झाल्या नाहीत. ऋतू चक्राप्रमाणे पाऊस, उन्हाळा, हिवाळा येतो व जातो. त्याप्रमाणे राजकीय भूमिका ठरतात, असेच याप्रश्नी दिसून येते. टंचाई काळात कोट्यवधीच्या योजना राबविल्या जातात. मात्र पाणी अडविता येईल अशा योजनांना निधी दिला जात नाही. यालाच म्हणतात राजकारण...विषय लांबवत ठेवणे, जेणेकरून आपण सत्तेत नसताना जनतेच्या भावनांना हात घालण्यासाठी काही मुद्दे शिल्लक राहीले पाहीजेत. यामुळेच दुष्काळाचे वातावरण हे वर्षानुवर्षे सुरू असल्याचेच लक्षात येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव