शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जनता कर्फ्यू ने कोरोनासह धुळीच्या त्रासापासून ही दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:29 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ला जळगावकरांनी चांगला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू ला जळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तीन दिवसांच्या या कर्फ्यू मुळे जळगावकरांचा केवळ कोरोना पासून बचाव होत नाही तर धुळीपासून देखील बचाव झाल्याचे दिसून आले. प्रत्येक आठवड्यात किंवा महिनाभरात जर जनता कर्फ्यू पुकारला तर शहरातील प्रदूषणासोबत कोरोना वर देखील काही प्रमाणात मात करता येईल असे मत जळगावकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेले दिसून आले.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशभर कोरोनाच्या संसर्गामुळे जीवनमानावर परिणाम झालेला दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली, व पुन्हा संपूर्ण जीवनमान नव्या ऊर्जेने व नव्या गतीने सुरु झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर प्रशासनाकडून पुन्हा जनतेला गर्दीत टाळण्याचे व सोशल डिस्टंसिंग पाडण्याचे आवाहन केले जात आहे. मार्च २०२० पासून सुरुवात झालेली परिस्थिती मार्च २०२१ मध्ये देखील त्याच परिस्थिती वर येऊन ठेपली आहे.

रस्त्यावरची धूळ झाली कमी

गेल्या काही वर्षांपासून जळगावकरांना धुळीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच गेला महिनाभरापासून ही समस्या वाढल्याने नागरिक थेट रस्त्यावर उतरू लागले आहेत. कोरोनाची कोणतीही तमा न बाळगता नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरत आहे. यामुळे जळगावकरांना कोरोना पेक्षा धुळीची समस्या जास्त त्रासदायक ठरत आहे. मात्र शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू मुळे कोरोना ची साखळी तर तुटणारच आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या जनता कर्फ्यू मुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. यामुळे रस्त्यांवर नेहमी उडणाऱ्या धुळीपासून जळगावकरांच्या बचाव झाला. निदान तीन दिवस तरी धुळीपासून बचाव होईल व सात वेळा घराची साफसफाई करण्यापासून गृहिणींना दिलासा तरी मिळेल.

शहरातील शुकशुकाट ठरला सोशल मीडियावरील ट्रेंड

सकाळपासून शहरातील रस्त्यांवर नेहमी होणारी गर्दी शुक्रवारी दिसून आली नाही. मुख्य बाजारपेठेमधील शुकशुकाट रेल्वे स्टेशन असो वा शहरातील मुख्य चौक सर्व ठिकाणी रस्ते ओस पडल्याने या मुख्य रस्त्यांच्या शुकशुकाचे व्हिडिओ व छायाचित्र दिवसभर सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याचे पाहायला मिळाले.

'' ती '' मालिश नसल्याने नेटकरी नाराज

गेल्यावर्षी जाहीर झालेला लॉक डाऊन दरम्यान गर्दी करणाऱ्या व रस्त्यांवर फिरणार्याना पोलिसांकडून चौकाचौकात चोप दिला जात होता. पोलिसांकडून होणारी ती मालिश सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. त्यामुळे शुक्रवारपासून पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यू दरम्यान देखील पोलिसांकडून गर्दी करणाऱ्यांना चोप मिळेल अशी शक्यता होती. मात्र पोलिसांनी माणुसकी दाखवत जनता कर्फ्यू मध्ये ती मालिश दिली नाही. मात्र, पोलिसांच्या या निर्णयावर नेटकरी काहीसे नाराज दिसून आले. मात्र शुक्रवारच्या जनता कर्फ्यू सोशल मीडियावर ट्रेंड करून गेला. तसेच अनेक व्हाट्सअप ग्रुप व फेसबुक वरील काही सामाजिक संस्थांच्या पेज वरून पुढील तीन दिवस देखील जनता कर्फ्यू पाडण्याचे आवाहन करण्यात आले.