शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

रेल्वे प्रशासनातर्फे गांधीधाम, पोरबंदर, राजकोटसाठी विशेष साप्ताहिक गाड्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:15 AM

सुविधा : जळगावला थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या १६ ...

सुविधा : जळगावला थांबा असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी येत्या १६ एप्रिलपासून गांधीधाम - पुरी, पोरबंदर - संत्रागाची व राजकोट ते रेवा दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादित गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून १६ एप्रिलपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये दर शुक्रवारी (गाडी क्रमांक ०९४९३) गांधीधाम ते पुरी दरम्यान धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी ०९४९४) ही दर सोमवारी पुरीहून गांधीधामकडे रवाना होणार आहे. तसेच १६ एप्रिल रोजीच पोरबंदर ते संत्रागाची दरम्यान (गाडी क्रमांक ०९०९३) दर शुक्रवारी धावणार असून, परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९०९४) ही संत्रागाचीहून दर रविवारी पोरबंदरकडे रवाना होणार आहे. त्यानंतर राजकोट ते रेवा दरम्यान ११ एप्रिल रोजी (गाडी क्रमांक ०९२३७) ही दर रविवारी धावणार आहे तर परतीच्या प्रवासासाठी (गाडी क्रमांक ०९२३८) ही दर सोमवारी रेवाहून राजकोटकडे रवाना होणार आहे. दरम्यान, या सर्व साप्ताहिक गाड्यांना जळगावला थांबा देण्यात आला असून, गाड्यांच्या वेळाबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

इन्फो :

तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश

रेल्वे प्रशासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या साप्ताहिक गाड्यांनाही तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. तिकीट आरक्षित असेल तरच गाडीत प्रवेश देण्यात येणार आहे. या गाड्यांना जनरल तिकीट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जे प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळतील, त्यांच्यावर रेल्वे प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येणार आहे.

इन्फो :

कुशीनगर एक्स्प्रेस तीन दिवस बंद

कुशीनगर एक्स्प्रेसचा १३ एप्रिलपासून गाडी क्रमांक बदलणार असल्याने, रेल्वे प्रशासनातर्फे ही गाडी ९ ते १२ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली असून, ही गाडी यापुढे सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.