शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अयोध्यानगर अंडरपासमध्ये तीन फुटांपर्यंत पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

भुसावळ : महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलापुढे अयोध्यानगरसह सुमारे १५ हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना फेरा वाचावा याकरिता अंडरपास ...

भुसावळ : महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलापुढे अयोध्यानगरसह सुमारे १५ हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना फेरा वाचावा याकरिता अंडरपास देण्यात आले आहेत. मात्र, यामध्ये तब्बल तीन फूट पाणी साचले असून नागरिकांना नवोदय पुलाखालून तब्बल दोन किलोमीटर फेरा मारून भुसावळकडे जावे लागत आहे.

महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलास लागून अयोध्यानगर, गणेश कॉलनी, भोईवाडा, नारायणनगर यासह नवीन वाढीव परिसरात दिवसागणिक वस्ती वाढत आहे. या परिसरातील नागरिकांना नाहाटा कॉलेज, बाजार परिसरात जाण्यासाठी दोन किलोमीटरचा फेरा वाचावा याकरिता आंदोलन केल्यानंतर अंडरपास देण्यात आला होता. मात्र, देण्यात आलेल्या अंडरपासमध्ये पहिल्याच पावसात तब्बल तीन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. येथून ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे.

पाण्यामुळे इंजिन पडतात बंद

अंडरपासमधून भुसावळकडे जाण्यासाठी केव्हा येण्यासाठी वाहन चालकांना तीन फूट पाण्यामधून मार्गक्रमण करावे लागते. तसेच दुचाकी, तीनचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जात असल्यामुळे ते पुलाच्या खाली बंद पडतात.