शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

रशिया-युक्रेन युद्धावर निवृत्त ब्रिगेडिअर अग्रवाल म्हणतात, हे काही जागतिक महायुद्ध नाही !

By अमित महाबळ | Published: March 27, 2023 6:55 PM

पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे.

अमित महाबळ

जळगाव : पाश्चात्य देशांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला जागतिक महायुद्ध म्हणणे चुकीचे आहे. ते युरोपचे युद्ध आहे. हे सत्य सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ब्रिगेडीअर संजय अग्रवाल यांनी केले. ते ‘लोकमत’शी बोलत होते.

युद्ध सुरू झाले तेव्हा त्यामध्ये आफ्रिकेतील ५४ देशांचा समावेश नव्हता. नंतर दबाव टाकला गेला. दक्षिण अमेरिका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी देश युद्धात नाहीत. त्यामुळे याला जागतिक महायुद्ध म्हणता येत नाही. हे युद्ध किती लांबेल हे स्पष्टपणे कुणी सांगू शकत नाही. रशिया एवढा मजबूत आहे तो पराभूत होऊ शकत नाही आणि अमेरिका व नाटो यांचा पाठिंबा असलेला युक्रेन इतका कमकुवत आहे की, तो जिंकू शकत नाही. दोन्ही बाजूने तयारीने युद्धात उतरल्या आहेत.

अमेरिका व पाश्चात्य देश चर्चा किंवा तहाद्वारे मागे हटले तर नंतर चीनदेखील दादागिरी करू लागेल. हे अमेरिका जाणून आहे. युक्रेन नाटोमध्ये येणार नाही हे त्यांनी सांगितले तर युद्ध लागलीच संपेल; पण हे होणार नाही. रशिया व अमेरिकेतील युद्धाची ‘युद्धभूमी’ युक्रेन आहे. युक्रेन केवळ एक प्यादा आहे. रशियाला आर्थिकदृष्ट्या संपविणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.

म्हणून युद्ध लांबणार...

अमेरिका व पाश्चात्य देशांचा अंदाज होता की, निर्बंधाद्वारे रशियाचे आर्थिक कंबरडे मोडता येईल; पण रशिया २०१४ पासून तयारी करत आहे. निर्बंधांचा त्यांच्यावर परिणाम झाला; पण हा देश आर्थिकदृष्ट्या कोलमडला नाही. अमेरिका व पाश्चात्य देशांची लवकर विजय मिळविण्याची रणनीती चुकली आहे. रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर ते अण्वस्त्रे वापरू शकतात.

एमआयसीला युद्ध होण्यात रस

अमेरिकेचा प्रमुख शत्रू चीन आहे; पण राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे लक्ष चुकीच्या दिशेने वळविण्यात आले. अमेरिकेत मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स (एमआयसी) आहे. त्यांना जगात युद्ध होण्यात स्वारस्य असते. त्यांची शस्त्रास्त्रे विकली जातात, नफा होतो. रशिया चीनची मदत घेत आहे. त्यांच्यातही काही मुद्यांवर मतभेद आहेत; पण या दोघांचाही मोठा शत्रू अमेरिका आहे. त्याच्या विरुद्ध हे देश एकत्र आले. भारत आपली शक्ती, प्रभाव वाढवत आहे. कोणा एकाच्या बाजूने झुकण्यापेक्षा स्वत:चे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. जगात भारताच्या मताला महत्त्व प्राप्त होत आहे.

पाकिस्तानचे काय?

पाकिस्तानात सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या नाजूक परिस्थिती आहे. पाकिस्तानचे तुकडे झाले तर त्यांच्याकडे १५० अण्वस्त्रे आहेत, ती शस्त्रे अयोग्य हातात पडावीत हे जगाला मंजूर नाही. म्हणून परिस्थिती असली तरी पाकिस्तान तुटणार नाही. चीन आपल्या कॉलनी बनविण्यासाठी पाकिस्तानला तुटू देणार नाही. कर्जे देऊन आधीच दबावात घेतले आहे. अमेरिकेला अण्वस्त्रांची भीती आहे. अमेरिका चीनविरोधासाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहे; पण पाकिस्तानात सरकारविरोधात बलूच नाराज आहेत. यामध्ये भारताला विशेष काही करण्याची गरज नाही. पाकिस्तान आपल्या विनाशाकडे स्वत:हून पुढे सरकत आहे. पाकिस्तानी जनता त्यांच्या सरकारमुळे त्रासलेली आहे. त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत. भारताने त्यामध्ये हस्तक्षेप करू नयेत.