शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

दंगेखोरांची नशिराबादमध्ये रात्रभर धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:12 AM

नशिराबाद/ जळगाव : नशिराबाद ये‌थे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर रात्रभर पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. त्यात मुस्ताक शेख ...

नशिराबाद/ जळगाव : नशिराबाद ये‌थे शनिवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीनंतर रात्रभर पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. त्यात मुस्ताक शेख मुसा कुरेशी, शेख अनिस शेख हसन, साजीदखान दाऊदखान, जुबरेखान सलीमखान व नूर मोहम्मद शेख मुस्ताक या पाच जणांना अटक करण्यात आली असून १९ जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यात छोटू भिका भोई, चेतन छोटू भोई, मंजाबाई अशोक भोई व विनायक मोतीराम भोई हे जखमी झालेले आहेत. अटकेतील संशयितांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नशिराबाद येथे काही दिवसापूर्वी जनावरांचे मांस पकडण्यात आले होते. त्यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयितांवर कारवाई झाली होती. त्याच कारणावरुन नशिराबादमध्ये गेल्या काही दिवसापासून धुसफूस सुरु होती. मांस पकडून दिल्याच्या कारणावरुन नशिराबादमध्ये शनिवारी रात्री एका गटाने दुसऱ्या गटावर लाकडी दांडके, लोखंडी सळईने हल्ला करुन दगडांचा मारा केला. यामुळे नशिराबादमध्ये वातावरण तापल्याने दोन गट समोरासमोर आले. या घटनेमुळे जळगावातून दंगा नियंत्रण पथक व राखीव दलाच्या तुकड्या मागविण्यात आल्या होत्या. चंद्रकांत गवळी यांनी रविवारी देखील दिवसभर नशिराबादमध्ये ठाण मांडले होते.

यांच्याविरुध्द दाखल झाला गुन्हा

मुस्ताक शेख मुसा कुरेशी, शेख अनिस शेख हसन, साजीदखान दाऊद खान, जुबेरखान सलीमखान, नूर मोहम्मद शेख मुस्ताक, मोहम्मद रईस शेख मेहबूब, अय्युबखान दाऊदखान, शोएब शेख गुलाब, असलम खान अय्याजखान, गफूरखान अहमदखान, बाली उर्फ अख्तरखान रज्जाकखान, रहीम हारुन मिस्तरी, अज्जु अल्ताफ खाटीक, शेख नासीर शेख सलीम बऱ्हाणपुरी, पीर मोहम्मद शेख मुस्ताक, बबलु रहिम (रिक्षावाला), हनिफ अफजोल्लीदीन बटाटेवाला, अजीज व बशीर यांच्यासह इतर ७ ते १० जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न करणे व नियोजनपूर्वक दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. छोटू भिका भोई यांनी फिर्याद दिली आहे. तपास भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार करीत आहेत.

कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

नशिराबाद येथील कत्तलखाना बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी वारंवार केली आहे, मात्र प्रशासनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हा कत्तलखाना बंद झाला असता तर कदाचित ही घटना घडलीच नसती, असेही गावकरी सांगत आहेत.

कोट...

नशिराबाद हे गाव आधीच संवेदनशील आहे. याआधी येथे दंगली झालेल्या आहेत. प्रभारी अधिकारी रजेवर असल्याने गाव वाऱ्यावर आले आहे. घटना घडली तेव्हा एकही अधिकारी येथे हजर नव्हता. मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण राहीले असते.

-लालचंद पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

कोट..

गावात आता शांतता आहे. राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केलेल्या असून आपण स्वत: थांबून आहोत. पाच जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल.

-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक