शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तुंच्या दुकानांना योग्य व्यवस्थापन करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तुंच्या दुकानांना योग्य व्यवस्थापन करून दिवसभर सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजीपाला विक्री करून न विकलेला माल फेकून आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना आंदोलकांनी निवेदन दिले.

सकाळी ११ ते दीड वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. कोरोनाचे निर्बंध पाळत पाच ते सहा आंदोलनकांनी भाजीपाला आणून सोशल डिस्टन्सिंग पाळून तो विकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक बसले होते. राज्यभर विविध ठिकाणी हे आंदेालन करण्यात आले. अमजद रंगरेज यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव विजय सुरवाडे, शहर सचिव खुशाल सोनवणे, शहर उपाध्यक्ष रियाज पटेल, सुकलाल पेंढारकर, रहीम तांबोळी यांनी भाजीपाला विक्री केला तर सुलतान शेख, शहराध्यक्ष इरफान शेख , देवानंद निकम, सुभाष सोनवणे यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

या आहेत मागण्या

खते, बियाणे जुन्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, बोगस बी बियाणे व भेसळयुक्त रासायनिक खते विक्री किंवा कृत्रिम तुटवटा निर्माण करुन चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यापा-यांचे परवाने रद्द करावेत, नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना द्यावेत, केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, अशा मागण्या करण्यात आल्या असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तातडीने या मागण्या शासनदरबारी पोहचविणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.