शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

जळगाव जिल्ह्यात आणखी ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:54 IST

४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

ठळक मुद्देटंचाईची तीव्रता वाढतेय ७१ विहिरींचे अधिग्रहण

जळगाव : जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिवाळा सुरू असतानाही सध्या ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला असून गत १५ वर्षांतील गंभीर दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके यापूर्वीच गंभीर दुष्काळी तालुके म्हणून जाहीर झाले आहेत. तर अन्य दोन तालुक्यांमधील काही मंडळ ही दुष्काळी घोषीत करण्यात आले होते. मात्र या दोन तालुक्यांसह सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्याने या दोन तालुक्यांचाही दुष्काळी जाहीर करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.७१ विहिरींचे अधिग्रहणडिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई भेडसावू लागली असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ६९ गावांमध्ये ७१ विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यात अमळनेर तालुक्यातील १७ गावे असून त्यापाठोपाठ मुक्ताईनगर १६ गावे, जळगाव १, जामनेर १, धरणगाव ८, एरंडोल ५, भुसावळ ७, बोदवड १, चाळीसगाव ५, भडगाव २, पारोळा ५ तर चोपडा तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे.६ पाणी योजनांना मंजुरीपाणीटंचाई भेडसावत असलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात ६ तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील जवखेडा, भडगाव तालुक्यात कजगाव, धोत्रे, बात्सर, पथराड व जामनेर तालुक्यातील पाळधी या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी पाळधीच्या पाणी योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. तर उर्वरीत तात्पुरत्या पाणी योजनांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.४४ गावांना टँकरने पाणीपुरवठामागील वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर या वर्षी पावसाळा सुरू झाला तरीही बंद होऊ शकले नव्हते. अमळनेर तालुक्यातील काही गावांना टँकर सुरूच ठेवावे लागले होते. यंदाही पुरेसा पाऊस न झाल्याने सध्या हिवाळा सुरू असतानाही जिल्ह्यातील तब्बल ४४ गावांना २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात अमळनेर तालुक्यातच सर्वाधिक ३० गावांना १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याखेरीज जळगाव तालुक्यातील १, भुसावळ तालुक्यातील २, मुक्ताईनगर तालुक्यातील १, चाळीसगाव ८, तर पारोळा तालुक्यातील २ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव