शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

चाळीसगावला ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : पाऊस लांबल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २२ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : पाऊस लांबल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २२ टक्के पेरा झाला आहे. आभाळभरोसे धूळपेरणी केलेल्या पिकांची स्थिती ठीक असली तरी, पावसाने अशीच उसंत घेतली तर ‘दुबार पेरणी’चे सावट गडद होणार आहे. मृग नक्षत्रातील दमदार पावसाची बळीराजाला प्रतीक्षा आहे. कोरडवाहू क्षेत्रासह ६८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या थांबल्या आहेत. कोरोना महामारीत आभाळमायाही बरसत नसल्याने शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहे.

चाळीसगाव तालुक्यात यंदा ९० हजाराहून अधिक हेक्टरवर खरिपाची लागवड होणे अपेक्षित आहे. रोहिणी नक्षत्रावर घाई करणाऱ्या पावसाने शेतकऱ्याच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या. ७३ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी मका, कपाशीचा धूळपेरा केला. मृग नक्षत्राच्या दमदार पावसात हा पेरा तगून जाईल हेच गणित शेतकऱ्यांचे असते. मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन १२ दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडेच एकवटले आहेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने कोरवाडवाहू क्षेत्रावरील पेरण्यांनादेखील ब्रेक लागला आहे.

चौकट

धूळपेरणीवरील सावट गडद

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच धूळपेरणी केली जाते. यावर्षी हा पेरा चार ते पाच हजार हेक्टरवर झाला आहे. पावसाने घेतलेली उसंत या पेरणीसाठी घातक ठरणार आहे. जमिनीत काहीअंशी ओल निर्माण झाल्याने ही पिके तगून आहेत. तथापि, अजून पाऊस लांबल्यास हा पेरा जुगार ठरण्याची शक्यता आहे.

चौकट

१४ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट

बागायती क्षेत्रावर २२ हजार हेक्टर पेरा झाला आहे. एकूण खरीप लागवडीच्या उद्दिष्टापैकी हा पेरा केवळ २० टक्के असून ६८ टक्के क्षेत्रावरील पेरणी पावसाअभावी होऊ शकलेली नाही. १६ व १७ रोजी झालेल्या पावसाने काही अंशी बागायती पेरणीला दिलासा मिळाला असला, तरी पावसाची ओढ लांबल्यास ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.

- तालुक्यातील १४ मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत.

- गेल्यावर्षीच्या पर्जन्यमानात देवळी-भोरस ७७ टक्के वगळता हातगाव एक व दोन, खडकीसीम, पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, वाघला एक व दोन, पिंपरखेड, कुंझर, बोरखेडे, वलठाण, राजदेहरे, पथराड, कृष्णपुरी व पाटबंधारे विभागातील मुंदखेडे, कोदगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. मात्र सद्यस्थितीत ते शून्यावर आले आहे. त्यामुळे वाहून निघणाऱ्या कोसळधार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.

- गिरणा धरणात ३२ टक्के तर मन्याड धरणातही सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. १ ते २० पर्यंत १०३ मिमी पाऊस १६ व १७ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यात सर्वाधिक बहाळ मंडळात २२ मिमी तर चाळीसगाव पाच, मेहुणबारे आठ, हातले पाच, तळेगाव दोन, शिरसगाव पाच, खडकी नऊ अशी मंडळनिहाय पावसाची नोंद महसूल विभागाने केली आहे. एक ते २० पर्यंत १०३.९६ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी आहे.

-मध्यंतरी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, पेरणी योग्य पाऊस अद्याप झालेला नाही. बागायती पिकांची स्थिती चांगली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणी मात्र खोळंबली आहे. धूळपेरणीतील पिके बऱ्या स्थितीत आहे. पावसाची ओढ त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे.

-सी. डी. साठे,

तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव.

चौकट

तालुक्याचे खरीप रिपोर्ट कार्ड

एकूण लागवडीचे उद्दिष्ट ९० हजार ३८४ हेक्टर

२० अखेर पेरणी झालेले क्षेत्र २२ हजार

१ ते २० पर्यंत एकूण झालेले पर्जन्यमान १०३.९६ मिमी

पाऊस नसल्याने ६८ हजार हेक्टरवरील पेरणीला ब्रेक

१४ मध्यम प्रकल्पातील जलसाठा शून्य टक्के

गिरणा ३२ तर मन्याडमध्ये सात टक्के जलसाठा