शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्य सर्वबाजुने अडचणीत - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:50 IST

पत्रपरिषद

ठळक मुद्देराजा तुपाशी अन् जनता उपाशीशेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसा
जळगाव- शेतक:यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रातही आम्ही मागे पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले आहे तसेच पिछाडीवर पडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने त्या जिल्ह्यात आल्या असून बुधवारी सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात ही पत्रपरिषद झाली. राजा तुपाशी अन् जनता उपाशीसरकारमुळे त्रस्त झालेली जनता मंत्रालयात आत्महत्या करीत असल्याने त्या रोखण्यासाठी मंत्रालयातही जाळ्या बसवाव्या लागल्या. जेथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बसले त्या इमारतीला आज जाळी बसवावी लागले आहे, याचे वाईट वाटते आहे. महागाई आणि बोरोजगारी वाढली असून ‘राजा तुपाशी अन् जनता उपाशी अशी आजची स्थिती असल्याची टिकाही सुळे यांनी केली. शिक्षणाचा अधिकार हिरावला जात आहेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे सर्वाना शिक्षणाचा अधिकार दिलेला असतांना, राज्य सरकार अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. अशाप्रकारे गरीबांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्याचा शासनाला काय अधिकार आहे? असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला. लोकांच्या अपेक्षांचे ओङो घ्यावे लागणार हल्लाबोल यात्रेदरम्यान लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षांचे ओङो आम्हाला घ्यावे लागणार आहे. यामुळे या प्रतिसादाचे ‘टेन्शन’ही आहे. मतांच्या अपेक्षेने ही यात्रा नसून सध्याचे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून आम्हाला निवडून यायचे नाही, तर आम्ही चांगले आहोत म्हणून आम्हला निवडून यायचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसाशेतक:यांच्य कजर्माफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे. लहान मुलीने दिलेली केळी ही सर्वात मोठी भेटसुप्रिया सुळे यांनी यावेळी एक अनुभवही सांगितला. रावेर येथील सभा आटोपून रस्त्याने जात असताना एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला तिच्या वडिलांसोबत उभी होती. तिने आमच्या गाडय़ांना हात दिला. मी गाडी थांबवली असताना तिने केळीची फणी भेट देवून सांगितले ताई आमच्या केळीला योग्य भाव मिळत नसून योग्य भाव मिळवून द्या. मुलीला असलेली चिंता पाहून मन गहिवरल्याचे सुळे यांनी सांगतले तर तिने दिलेली केळीची भेट सर्वात मोठी वाटली, असेही त्यांनी सांगितले.