शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

विजेचा लपंडाव थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:20 AM

याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. ...

याबाबत सविस्तर असे की, महावितरण कंपनीचे प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक नियमित ग्राहक असून नियमित लाइटबिल भरत असतात. मात्र, काही महिन्यांपासून प्रभाक क्र. १२ येथे रोज रात्री वारंवार लाइट जात असल्याने प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पाऊस न झाल्याने प्रचंड प्रमाणात उकाडा होत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना, आजारी असलेल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री वीजपुरवठा बंद झाल्याने चोऱ्यासुद्धा होण्याची शक्यता आहे.

रात्री वीजपुरवठा कधीही येतो, त्यात काही वेळेस विजेचा दाब कमी असल्याने इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा खराब झाल्या आहेत. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर संबंधित विभागात फोन केला तर तेथे कोणीही फोनसुद्धा उचलत नाही, असे नेहमी होत असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत प्रत्यक्षात तपासणी करून जो काही तांत्रिक बिघाड असेल, तो सुधारला जावा व वीजपुरवठा सुरळीत करावा. नियमित वीजपुरवठा देण्याची मागणी प्रभाग बारामधील नागरिकांनी केली आहे. अन्यथा, जोपर्यंत सदरील त्रास बंद होत नाही, तोपर्यंत दरमहा लाइटबिल भरणार , असा इशारा या प्रभागातील गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, थितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम अशांनी निवेदनावर सही करून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो कॅप्शन :- भुसावळ शहरातील तापीनगर परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज कंपनी कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवासी निवेदन देताना.

फोटो - ०६/६