शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

साठवणुकीची अडचण, त्यात अवकाळी पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:12 AM

उत्पादन झालेला कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यातच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात ४० अंशाच्या वरती पोहोचत ...

उत्पादन झालेला कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यातच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात ४० अंशाच्या वरती पोहोचत असते. हे वातावरण कांदा साठवणीसाठी पोषक नसून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांप्रमाणे जळगाव येथील शेतकऱ्यांना कांदा दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. कालांतराने तापमानामुळे हा कांदा खराब होतो. तरीदेखील काही शेतकरी कांदा चाळीच्या माध्यमातून हा कांदा साठवून ठेवतात; परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकरी साठवून ठेवलेला कांदा हा पोळा सणानंतर विक्रीस सुरुवात करतात. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील कांदा पोळा सणापर्यंत टिकत नाही; त्यामुळे लवकर हा कांदा बाजारपेठेत न्यावा लागतो आणि बाजारभाव कमी असल्यामुळे उत्पादन आणि खर्चामध्ये तफावत असते. त्यामुळे येथील शेतकरी कांदा लागवडीकडे दुर्लक्ष करत आहेत.

साधारणत: कांदा लागवड डिसेंबर महिन्यात ते जास्तीत जास्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात. सुरुवातीला कांद्याच्या फुलांपासून बी धरून ते बी पाण्याचा निचरा होणाऱ्या वाफ्यांमध्ये टाकले जाते. कांद्याच्या बीपासून रोप तयार होण्यासाठी साधारणतः ४५ ते ५० दिवस इतका कालावधी लागतो. कांदा लागवडीनंतर ते काढणीपर्यंत ९० दिवसांचा काळ असतो; परंतु येथील हवामान आणि जमीन यामुळे आपल्याकडील कांद्याला साधारणतः साडेतीन ते चार महिने कालावधी कांदा तयार होण्यासाठी लागत असतो.

एका एकरामध्ये बियाण्यापासून ते काढणीपर्यंत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च हा कांदा लागवडीसाठी येतो. या परिसरात साधारणत: एका एकरामध्ये ८० ते ९० क्विंटल कांदा शेतकरी पिकवतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मातीमोल भावात कांदा विकला होता.

आंतरपीक म्हणून कांद्याला पसंती

गिरणा परिसरात गुढे, कोळगाव, खेडगाव, पथराड, नावरे, सावदे, जुवार्डी, बहाळ तसेच संपूर्ण भडगाव तालुक्यात लिंबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काही प्रमाणात पेरूचेदेखील उत्पादन शेतकरी घेतात. या परिसरातील जमीन काळी कसदार असल्याने शेतकरी लिंबू किंवा पेरू फळबाग लावली की, त्यात तीन ते चार वर्षे आंतरपीक घेतात. त्यामध्ये अनेक शेतकरी कांदा पिकाला आंतरपीक म्हणून पसंती देत असतात.

कांदाचाळ आणि शेतकरी

बरेच शेतकरी यंदा कांदा लावला की पुढच्या वर्षी कांद्याचे पीक घेत नाहीत. त्यामुळे एका वर्षासाठी कांदाचाळीसाठी शेतकरी लाखोंचा खर्च करत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना साठवण्यासाठी कांदाचाळ उपलब्ध नसल्यामुळे माल निघाल्यावर लगेचच चार ते पाच रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ येते. लगेच मार्केटला पाठवला तर बाजारभाव मिळत नाही आणि साठवला तर तो तापमानामुळे जास्त काळ टिकत नाही, अशा दुहेरी संकटात गिरणा पट्ट्यातील शेतकरी सापडतो.

यावर्षी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांत गारपीट, अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे आज चांगला कांदा दहा रुपयांपासून ते पंधरा, सोळा रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला जात आहे; परंतु अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आलेल्या उत्पादनात झालेल्या मोठ्या प्रमाणात घटीमुळे उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये ताळमेळ बसताना दिसत नाही. जळगाव जिल्ह्यात कांद्याला चांगली बाजारपेठ नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला आपला माल नाशिक जिल्ह्यातील उमराणा, मुगंशे, चांदवड, मनमाड या बाजारपेठांत घेऊन जावा लागतो.

जळगाव येथे कांदा मार्केट आहे; परंतु तेथे कांदा हा गोण्यांमध्ये भरून घेऊन जावा लागतो. गोण्यांचा खर्च आणि भरण्याची मजुरी न परवडण्यासारखी आहे. चाळीसगाव येथे स्पेशल कांदा मार्केट गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू करण्यात आले असले तरी उमराणा, मुगंसे, पिंपळगावच्या बाजारभावापेक्षा चारशे, पाचशे रुपये भाव कमी असतो.

कांदा पीक लागवडीसाठी मेहनत आणि खर्च जास्त येतो. उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

-संकेत जगताप, गुढे

चाळीसगाव कांदा बाजार समितीत इतर बाजार समित्यांप्रमाणे जास्तीत जास्त बाजारभावामध्ये कांदा खरेदी करावा, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.

-प्रमोद महाजन, गुढे

===Photopath===

270521\27jal_1_27052021_12.jpg

===Caption===

साठवणुकीचा अभाव त्यात अवकाळी पावसाचा जोर