शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

आर्द्रा नक्षत्राची विचित्र अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:12 AM

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा ...

खेडगाव, ता. भडगाव : या पावसाळ्यात आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून खेडगाव भागात एका शिवारात काही मिनिटे दडदड कोसळणारा पाऊस तर दुसरा शिवार कोरडा राहत असल्याने, पावसाने सीमावाद जोपासल्याची अनुभूती येत आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता खेडगाव शिवारात दहा-पंधरा मिनिटे वादळासह झालेला पाऊस शिंदी शिवारात नव्हता.

आर्द्रा नक्षत्र लागल्यापासून याच एका टप्प्यात चार-पाच जोरदार पाऊस झालेत. अक्षरशः दहा-बारा दिवस पावसामुळे आंतरमशागत खोळबंली होती. मागील चार दिवसापासून उघडीप दिल्याने जरा कुठे वखरणी, कोळपणी व निंदणीचा वाफसा झाला होता. तोच पावसाने हजेरी लावली. पावसाची धार पडणे, वहाय पडणे असा शब्दप्रयोग शेतकरी यास संबोधतात. मागील आठवड्यात गिरणानदीच्या उत्तरेस खेडगाव-बात्सर भागात झालेला पाऊस गिरणानदीच्या दुसरीकडे कजगाव भाग कोरडा ठेवून गेला. जणू काही पावसासाठी गिरणानदी लक्ष्मणरेषाच ठरली. यामुळे एकाच तालुक्यात पाच-सहा किमीवर एकीकडे पिके तहानलीत तर दुसरीकडे आंतरमशागतीस योग्य वाफसा होत नसल्याची स्थिती आहे. क्षणात दाटून येणारे ढग, अचानक वादळ व त्याबरोबर दडदड कोसळणारा पाऊस निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव देत आहे.

फोटो कँप्शन :

खेडगावच्या शिवारात रविवारी झालेला पाऊस

पावसाअभावी एरंडोल तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर....

एरंडोल : तालुक्यात जवळपास आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे इवल्या-इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे.

पावसाअभावी पिके कोमजत आहेत. दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एरंडोल तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात

मृगनक्षत्र हे मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात ज्वारी, मका, उडीद, मूग, कोरडवाहू कपाशी यांचा समावेश आहे. खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. एरंडोल, कासोदा, तळई, उत्राण, रिंगणगाव, खर्ची, रवंजे, या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसनवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत असा प्रश्न सर्वसामान्य

शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष हे की रोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. रविवारी पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज मात्र पाऊस हुलकावणी देतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने खऱ्या अर्थाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.