शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!

By अमित महाबळ | Published: May 04, 2023 8:32 PM

परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या सध्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. कोविडमुळे गेली दोन वर्षे शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक लांबले होते. आता नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षा संपताच ३० दिवसांच्या आत निकाल लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार किमान ३० ते कमाल ४५ दिवसांत परीक्षांचे निकाल लावावे लागतात. ही कालमर्यादा पाळली जावी म्हणून नियोजन करण्यात आले आहे. बी. कॉम. व डी. पी. ए. अभ्यासक्रमांचे पेपर ऑनलाइन तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्राध्यापकांनी सहभाग नोंदवावा व वेळेच्या आत ऑनलाइन तपासणी पूर्ण करावी. ३० दिवसांत निकाल लावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाला प्राध्यापकांचे सहकार्य हवे आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी सांगितले. 

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी