शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
3
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
4
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
5
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
6
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
7
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
8
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
9
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
10
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
11
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
12
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
13
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
14
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
15
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
16
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
17
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
18
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
19
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
20
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

जळगावात संततधारने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:50 AM

अनेकांचे संसार पाण्यात

ठळक मुद्देरस्त्यांची प्रचंड दुरवस्थाकचऱ्या साचल्याने आरोग्य धोक्यात

जळगाव : सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी भागासह नाल्यालगत असलेल्या परिसरात जवजीवन विस्कळीत झाले असून रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तांबापुरा भागात घरे गळत असल्याने अनेकांचे संसार पाण्यात आहे तर मेहरुणमधील रेणुकानगर, पिंप्राळा हुडकोत परिसरात घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या भागात तर रस्त्यांची चाळणी झाल्याने चालणे कठीण होत आहे. या सोबतच या सर्व भागांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरण्यासह डासांचा त्रास वाढल्याने आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शहरासह परिसरातील नशिराबाद, शिरसोली, दापोरा, म्हसावद परिसरातही झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.जोरदार पाऊस झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यालगत असलेल्या व झोपडपट्टी भागातील रहिवाशांचे दरवर्षी प्रचंंड हाल होत असतात. त्याप्रमाणे यंदाही १६ रोजी झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा २० रोजी सुरू झालेल्या व मंगळवारी संध्याकाळपर्यंत सलग २४ तास सुरू असलेल्या पावसामुळे या भागांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रत्यक्ष त्या भागांमध्ये जाऊन पाहणी केली असता नागरिकांचे प्रचंड हाल होण्यासह आरोग्यासाठी धोकादायक असणारे चित्र दिसून आहे.तांबापु-यात घरांमध्ये पाणीतांबापुरा भागात अनेक झोपडी वजा घरे गळत असल्याचे दिसून आहे. यामुळे घरांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण संसारच पाण्यात आहे. घरे गळत असल्याने घरातील पाणी वारंवार बाहेर फेकावे लागत आहे. कोणी भांड्यांच्या सहाय्याने तर कोणी कपड्याने पाणी निपळून बाहेर काढत आहे. मात्र सलग सुरू असणाºया पावसामुळे खाली पाणी काढत नाही तोच पुन्हा छतातून पाणी गळणे सुरूच आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी पाणी फेकून-फेकून हैराण झाले आहे. या पाण्यामुळे घरातील भांडे, गॅस, अंधरुन यासह सर्व साहित्यदेखील पाण्यात आहे. इतकेच नव्हे स्वयंपाक करणेही कठीण होत असल्याने उपाशी राहण्याचीही वेळ येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. अनेक घरांमध्ये पाणी गळणाºया ठिकाणी भांडे लावले असून त्यात पाणी साचले की ते १०-१५ मिनिटांनी फेकत आहे.रात्र काढली जागून; अबालवृद्धांचे हालतांबापुरातील घरात पाणी असल्याने जमिनीवर असो की खाटेवर अंथरूण टाकता येत नाही. झोपायलाही जागा नाही. त्यामुळे सोमवारी रात्री अनेकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. यामध्ये लहान मुले व वृद्धांचे अधिक हाल होत असल्याचे येथे चित्र आहे.रेणुकानगरात घरांना पाण्याचा वेढामेहरुण परिसरातील रेणुकानगरात तर अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. बाहेर पाणीच-पाणीच असल्याने घराबाहेर जावे कसे असा प्रश्न या रहिवाशांसमोर उभा राहिला आहे. संपूर्ण घरच पाण्यात असल्याने घरांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. घराबाहेर जाताना एकमेकांचा आधार घेत मोठी कसरत करीत नागरिक येथून वापरत आहे. त्यात सरपटणाºया प्राण्यांची भीती मनात कायम असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या पाण्यामुळे रात्रंदिवस डासांचा त्रास होत आहे तर रात्री पाण्यातील बेडकांच्या आवाजामुळे झोपही लागत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या घरांसमोरच असलेल्या नाल्यालगत कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयामुळे वाढलेल्या डासांचाही त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.शौचालयाजवळही साचले पाणीमेहरुण परिसरातीलच रेणुकानगर समोर असलेलेल्या नाल्या लगतच्या सार्वजनिक शौचायलयाजवळही पाणी साचले आहे. त्यामुळे नाल्याला पाणी वाढले की, शौचालयातदेखील जाणे बंद होते. त्यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होतात.पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात कचराच कचरामेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिराजवळून वाहणाºया नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. यात प्लॅस्टिक कचरा अधिक असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येतात. हा कचरा काढला जात नसल्याने नाल्याचे पाणी रहिवाशी भागात शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. मनपा याकडे दुर्लक्ष करून दोन वर्षापूर्वी उद््भवलेली स्थिती पुन्हा निर्माण करीत आहे का असा सवालही येथील रहिवाशांनी उपस्थित केला.कचºयाच्या ढिगांमुळे माशा, डास, दुर्गंधीतांबापुरा, मेहरुण, रामेश्वर कॉलनी, सुप्रीम कॉलनी या सर्वच भागांंमध्ये जागोजागी कचºयाचे ढीग लागलेले आहे. या कचºयांवर डुकरांचीही संख्या मोठी असल्याचे पाहणी दरम्यान दिसून आहे. हा कचरा पाण्यामुळे कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सोबतच कचºयामुळे डासांची उत्पत्ती होण्यासह माशांचीही संख्या वाढली आहे.अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यातमेहरुण भागातील पंचमुखी महादेव मंदिरासमोर असलेल्या मोकळ््या जागेत तर सर्वत्र चिखल झाला आहे. या सोबतच रस्त्यांवरदेखील जागोजागी चिखल असून कचºयांसह डुकरांच्या अंगावरील माशा, डास घरांपर्यंत पोहचत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले.रस्त्यांची चाळणीमेहरुण भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या सोबतच रामेश्वर कॉलनीमधील सप्तश्रृंगी नगरातील लाल बाग चौकात रस्त्यांची चाळणी झाली आहे. इतकेच नव्हे मेहरुणकडून रामेश्वर कॉलनीकडे जाणारा रस्ता, शिवाजी उद्यान ते रामेश्वर कॉलनी, तांबापुरा, सुप्रीम कॉलनी या भागातही रस्त्यांची बिकट स्थिती आहे. इच्छादेवी चौक ते शिरसोली रस्त्यावरदेखील जागोजागी मोठे खड्डे पडलेले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयापासून शिरसोली रस्त्याकडे जाणाºया मार्गाचीही पावसामुळे दैना झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावरील खडी, डांबर उखडल्याने ते वाहन धारकांसाठी धोकेदायक ठरत आहे. अशीच स्थिती शहरातील इतर भागांमध्येही आहे.तीन-तीन महिने साचून राहते पाणीरेणुकानगरात घरांभोवती साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून ते किमान तीन महिने तरी तसेच राहते, असा अनुभव नागरिकांनी सांगितला. एवढ्या दिवस या रहिवशांना कसरत करीत येथून ये-जा करावी लागते.सुप्रीम कॉलनीतील रहिवाशांचेप्रचंडहालसुप्रीम कॉलनी परिसरातही रहिवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्य रस्ता बरा असला तरी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. लहान-लहान गल्ली-बोळांमध्ये झालेल्या चिखलामुळे पायी चालणे कठीण असून दुचाकीस्वारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.या भागातही चिखलामुळे व साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढत आहे व कचºयामुळे दुर्गंधी पसरत आहे.अनेक झोपड्यांवर मेनकापडतांबापुरा, रामेश्वर कॉलनी, मेहरुण तसेच सुप्रीम कॉलनी या भागात असलेल्या झोपड्या तसेच फळ््यांच्या घरांना मेनकापड लावून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न रहिवाशी करीत आहे. असे असले तरी जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी गळतच असल्याने रहिवाशांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव