शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

शाळेत न जाताही द्या दहावी-बारावीची परीक्षा !

By अमित महाबळ | Published: August 23, 2023 7:58 PM

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज ...

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देता येते. त्यासाठी बारावीप्रमाणेच आता दहावीच्या खासगी विद्यार्थ्यांचेही अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधून स्वीकारले जाणार आहेत. मार्च २०२४ परीक्षेपासून ही सुविधा लागू झाली आहे.

दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क केंद्रामार्फत नोंदणी करावी लागत होती. आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे. बारावीचे खासगी विद्यार्थी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरतात, त्याच धर्तीवर दहावीचे खासगी विद्यार्थी नोंदणीचे अर्ज सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून भरू शकणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता पाचवी उत्तीर्ण असून, अर्ज ऑनलाइन आहे.

यादीतून शाळा, कॉलेज निवडा

नाव नोंदणी करताना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याला त्याचा पत्ता व त्याने निवडलेले माध्यम यानुसार शाळांची यादी ऑनलाइन दिसेल. त्यामधील एका शाळेची निवड त्याने करायची आहे.

दिव्यांग असाल तर प्रमाणपत्र द्या

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरीत्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करायची आहे. ही कागदपत्रे द्या..

शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय पत्र व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील फोटो. ऑनलाइन अर्ज भरताना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. विद्यार्थ्याचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी द्यायचा आहे.

असा मिळवा अर्ज

अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रत विद्यार्थ्याला ई-मेलवर मिळेल. त्याची प्रिंटआऊट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र दोन प्रतीत शाळा / महाविद्यालयात जमा करायचे आहे.

ही चूक दुरुस्त होईल; पण सशुल्क...

नाव नोंदणी अर्जातील माध्यम, शाखा, शाळा / महाविद्यालयाचे नाव व इतर दुरुस्ती करायची असेल तर विद्यार्थ्याला पुन्हा नावनोंदणी शुल्क द्यावे लागणार आहे. असे आहे वेळापत्रक- विद्यार्थ्यांची नावनोंदणी, ऑनलाइन शुल्क - ११ सप्टेंबरपर्यंत- अर्ज व इतर कागदपत्रे शाळेत जमा करणे - १३ सप्टेंबरपर्यंत - शाळांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे मंडळात देणे - दि.१५ सप्टेंबर 

पण, एवढा गॅप असावा लागतो

नववीनंतर लागलीच पुढील शैक्षणिक वर्षात दहावीसाठी १७ नंबरचा अर्ज भरता येत नाही. नववीनंतर गॅप असावी लागते. हे अर्ज भरलेल्यांनी शाळेत नियमित येण्याची गरज नसते, अशी माहिती नंदिनीबाई विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील यांनी दिली. विद्यार्थी दरवर्षी शाळेतून १७ नंबरचा अर्ज भरतात. दहावी व बारावीची परीक्षा आधी दिली नसेल तर त्यांना १७ नंबरचा अर्ज भरता येतो. नववीनंतर किमान दोन वर्षांची गॅप असावी लागते, अशी माहिती श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या (कुसुंबा) प्राचार्या प्रतीक्षा पाटील यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव